काय चाललयं अवतीभवती

अश्वमेध ग्रंथालयाचे अक्षर गौरव साहित्य पुरस्कार जाहीर

सातारा येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय यांचे वतीने दरवर्षी दिले जाणारे राज्यस्तरीय “कै भास्करराव माने स्मृत्यर्थ, अक्षर गौरव साहित्य पुरस्कार २०२१” जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ विचारवंतसाहित्यिक किशोर बेडकिहाळ यांचे हस्ते व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष व साहित्यिका सुनिताराजे पवार यांचे प्रमुख उपस्थितीत रविवारी ( ता. २१ ऑगस्ट २०२२) सायंकाळी साडेपाच वाजता सातारा येथील पाठक हॉलमध्ये होणार आहे, अशी माहिती अश्वमेध ग्रंथालयाचे संस्थापक, माजी सभापती रविंद्र भारती- झुटिंग यांनी दिली आहे.

पुरस्कारांचे हे दहावे वर्ष आहे. अश्वमेध ग्रंथालय वाचन संस्कृती वृद्धिगत व्हावी म्हणून साहित्य उपक्रम घेत असते.

कै. भास्करराव माने स्मृत्यर्थ “अक्षर गौरव साहित्य पुरस्कार २०२१” चे विजेते असे :

१. नोटबंदी – लेखक दि. बा. पाटील – कथासंग्रह
२. आदिवासींचेही डॉ बाबासाहेब आंबेडकर – डॉ तुकाराम रोंगटे – संशोधन
प्रत्येकी २५०० रु व स्मृतीचिन्ह

कै. भास्करराव माने स्मृत्यर्थ “अक्षर गौरव साहित्य विशेष पुरस्कार २०२१” चे विजेते असे :

१. कविवर्य नारायण सुर्वे मास्तरांचे विद्यापीठ – . उध्दव कानडे / पुरुषोत्तम सदाफुले – संपादन संग्रह
२. वात्सल्यसूक्त – प्रकाश जडे – काव्यसंग्रह
३. गुंता – राजन लाखे – ललित लेखसंग्रह
प्रत्येकी १००० रु व स्मृतीचिन्ह

कै. भास्करराव माने स्मृत्यर्थ “अक्षर गौरव साहित्य प्रेरणा पुरस्कार २०२१” (सातारा जिल्ह्यातील लेखकांसाठी)

१. संविधानाच्या स्वप्नातलं गाव – डॉ. सुभाष वाघमारे काव्यसंग्रह
२. भूतान एक आनंदयात्रा – राजेंद्र वाकडे – प्रवासवर्णन
३. मन सांधते आभाळ – मनिषा शिरटावले – काव्यसंग्रह
प्रत्येकी ५०० रु व स्मृतीचिन्ह

डॉ. श्रीकांत कारखानीस स्मृत्यर्थ, आरोग्य विषयक पुस्तकासाठी दिला जातो. हा पुरस्कार लेखक दिपक प्रभावळकर यांच्या कोविडायन डायरी ऑफ पेन्डॅमिक पुस्तकास देण्यात येणार आहे. १००० रुपये व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहेय

या वर्षी परिक्षक म्हणून डॉ. राजेंद्र माने, सचिन प्रभुणे, कांता भोसले यांनी काम पाहीले. तरी या कार्यक्रमास सर्व साहित्यप्रेमींनी आवर्जुन उपस्थित रहावे अशी विनंती लेखक व ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष डॉ राजेंद्र माने व ग्रंथालयाचे अध्यक्ष, शशिभूषण जाधव यांनी केली आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तुळजापूर येथील जागर साहित्य पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन Call for Jagar Literary Award In Tuljapur

तुळजापूर : मराठवाडा साहित्य परिषद, शाखा तुळजापूर यांच्या वतीने 'जागर साहित्य पुरस्कार' जाहीर करण्यात आला…

10 hours ago

तेंगबोचेची खडतर अन् रम्य वाट.. The difficult and beautiful path to Tengboche

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी भाग - ६ एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या प्रवासातील तेंगबोचेकडे जाणारा टप्पा म्हणजे हिमालयाच्या…

19 hours ago

ओअँसिसचा हिरवा श्वास अन् सहाराच्या वादळाचा काळा कहर The green breath of the oasis

सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने…

1 day ago

क्षणाचाही विलंब नको : ज्ञानेश्वरीतील संन्यासयुक्तीचा सहज, सोपा आणि जीवनाला दिशा देणारा संदेश A message that gives direction to life

"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…

2 days ago

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…

3 days ago

अयोध्येतील दानपेटी प्रकरण : श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कसोटी Ram Mandir Donation Box Case

स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…

3 days ago