Freelance as a carrer article by rajendra ghorpade
नागपूर येथे झालेल्या वर्डकॅम्पमध्ये मुक्त पत्रकारिता या विषयावर बोलण्याची संधी मिळाली. यातील काही संपादित अंश…
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
तुम्हाला लिखाणाची सवय आहे का ? कितीजण ब्लॉग लिहीता ? कितीजणांना वेगळे विषय लिहीण्यात रस आहे ? कोणत्या प्रकारचे लिखाण तुम्ही करता ? कितीजणांना असे वाटते आपण स्वतंत्रपणे लिखाण करायला हवे ? लेखक पुस्तक लिहितो पण हे पुस्तक लिहिताना त्याचे वाचणही तितकेच महत्त्वाचे आहे. त्या विषयातील सर्व गोष्टी जाणून घेण्यात रस असायला हवा. तेंव्हाच तुम्ही यशाचे शिखर गाठू शकाल.
तुम्हाला नारद मुनी माहीत आहेत का ? ते कोणते काम करायचे ? तसा हा संशोधनाचा विषय आहे. नारद हे कोणत्याही राजाकडे कामाला नव्हते. विना घेऊन सर्वत्र हिंडायचे. पण सर्व राजांच्या दरबारात त्यांना मानाचे स्थान होते. इंद्राच्या दरबारात गेले तरीही मान, इतर देवतांच्या दरबारात गेले तर प्रथम त्यांचाच मान असायचा. असे कोणते काम करायचे ज्यामुळे त्यांना सर्वत्र मान अन् आदरसत्कार मिळत होता. त्यांना जगात घडणाऱ्या सर्व घडामोडीची माहिती असायची. त्यामुळे त्यांना मागणी प्रचंड होती. मोठ मोठे राजेही त्यांना स्वतःहून बोलवून घेत. या कामाचा मोबदलाही त्यांना चांगला मिळत असे.
म्हणजेच आपणच आपला ब्रँड व्हायचे. आपल्या नावालाच मागणी असावी असे व्यक्तीमत्व आपण घडवायचे. आपली गरज सर्वांना वाटावी असे काम, कर्तृत्व आपण घडवायला हवे. राजाचे काम अडले की राजाला नारदाची आठवण होत असे. तसे आपण आपले व्यक्तिमत्त्व घडवायचे. आपण त्यांचे काम करून द्यायचे अन् त्याचा चांगला मोबदला आपण मिळवायचा. नारदाला सर्वच राजांकडून मागणी होत असे. तशी विविध कंपन्यांकडून आपल्या नावाची मागणी व्हायला हवी. आता तुम्ही म्हणाल प्रत्येकवेळी आपल्याला काम मिळेलच असे नाही. पण कंपनीने ते काम आपणालाच द्यायला हवे असे व्यक्तीमत्व आपले असायला हवे. मुक्त पत्रकारही असेच व्यक्तिमत्त्व आहे.
मुक्त पत्रकारिता…
फ्रिलान्स अर्थात मुक्त पत्रकार हा कंपनीत कामाला नसतो पण कंपनीचे काम तो करत असतो. वृत्तपत्रात आपण कामाला नसतो पण वृत्तपत्रातील स्तंभ नियमितपणे आपल्या नावाने प्रसिद्ध होतात. त्याचा उत्तम मोबदलाही आपणाला मिळतो. मुक्त पत्रकार हा एक लेखक असतो जो स्वयंरोजगारी असतो. ते वृत्तपत्रे, मासिके, कंपन्या आणि इतर संस्थांसाठी कराराचे काम किंवा नियमित नेमून दिलेले काम पूर्ण करतात. त्यांना यातून त्याच्या कामाचा मोबदला मिळतो. त्यामुळे मुक्त पत्रकारांना कंपनीचे किंवा संस्थेचे बंधन नसते. कंपनीत आठ तास कामावर हजर राहावे याचे बंधन नाही. आज सुट्टी घ्यावी वाटली तर ते निर्णय घेण्यासाठी मुक्त असतात. स्वतंत्रपणे ते काम करत असतात. त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्य असते. इतकेच काम तर स्वतःच्या कामाचा मोबदला स्वतः ठरवण्याचे स्वातंत्र्यही मुक्त पत्रकाराला असते. इतके मानधन देत असाल तर लेख देऊ अशी अट ते घालू शकतात.
फ्रिलान्सर होण्यासाठी हे आवश्यक…
संधी आणि महत्त्व
2025 पर्यंत फ्रीलान्सिंग इंडस्ट्रीमध्ये भरभराट होणार आहे. फ्रीलांसिंग उद्योग आपल्या कल्पनेपेक्षा खूप मोठा आहे. 57 दशलक्ष अमेरिकन देशाच्या स्वतंत्र अर्थव्यवस्थेत योगदान देणारे आहेत. भारतात अंदाजे 15 दशलक्ष फ्रीलांसर विविध डोमेन जसे की IT, ग्राफिक डिझाइन, वेब डेव्हलपमेंट, डेटा एंट्री आणि इतरांवर काम करतात.
मुक्त पत्रकारिता वाढण्याची कारणे…
वेब पोर्टल संघटनेकडील नोंदीनुसार महाराष्ट्रात सुमारे पाच हजार न्यूज वेबसाईट आहेत. डेलिहंटवर १५० हून अधिक वेबसाईट आहेत. त्यामध्ये १०० च्यावर न्यूज वेबसाईट आहेत. विविध विषय घेऊन न्यूज वेबसाईट तयार करण्याकडे कल वाढला आहे. मनोरंजन, स्पोर्ट, लाईफस्टाईल, कृषी, उद्योग, अर्थकारण, शिक्षण, करिअर ( स्पर्धा परीक्षा ), आरोग्य, व्यायाम अर्थात योगासने, अध्यात्म, क्राईम, तंत्रज्ञान, पर्यटन, अॅटो, टेंडर घडामोडी, साखर घडामोडी अशा विविध विषयांच्या वेबसाईट आहेत.
डिजिटल पत्रकारितेमध्ये येत असलेले नवे ट्रेंड…
एकच विषय घेऊन त्या विषयाची सखोल माहिती देणाऱ्या वेबसाईटची संख्या आजकाल वाढत आहेत. असे विषय हाताळणाऱ्यामध्ये मुक्त पत्रकारांची संख्या अधिक आहे.
सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने…
"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…
स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…
आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…