काय चाललयं अवतीभवती

कोल्हापूरच्या आयटी क्षेत्रासाठी आनंदाची बातमी !

कोल्हापूरः आमदार अमल महाडिक यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आयटॅकचे अध्यक्ष प्रताप पाटील व अन्य सदस्यांनी भेट घेतली. या भेटीत कोल्हापूरमध्ये IT पार्क जाहीर केल्याबद्दल IT Association of Kolhapur तर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

कोल्हापूरमध्ये सध्या सुमारे 372 आयटी कंपन्या कार्यरत आहेत आणि हजारो युवक IT क्षेत्रात काम करत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर IT पार्कमधील भविष्यातील विकास आणि रोजगारवाढ लक्षात घेऊन IT Association of Kolhapur ला जमीन वाटपामध्ये प्राधान्य द्यावे, अशी विनंती आयटी असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना केली. कोल्हापूरला एक मजबूत IT Hub बनवण्यासाठी IT Association of Kolhapur सातत्याने प्रयत्नशील राहील, असे आश्वासन यावेळी असिसिएशनच्यावतीने देण्यात आले.

कोल्हापूर ‘आयटी पार्क’चा ‘शासन निर्णय’ (GR) अखेर प्रसिद्ध; ‘आयटॅक’च्या (ITAK) प्रदीर्घ लढ्यातील पहिले ऐतिहासिक यश !

कोल्हापूरच्या शेंडा पार्क परिसरात नव्याने साकारण्यात येणाऱ्या ‘आयटी पार्क’चा अधिकृत शासन निर्णय (GR) राज्य शासनाकडून अखेर प्रसिद्ध करण्यात आला आहे. आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर (ITAK) आणि स्थानिक आयटी उद्योजकांनी गेली अनेक वर्षे पाहिलेले हे स्वप्न आता खऱ्या अर्थाने दृष्टिपथात आले आहे. विशेष म्हणजे, या शासन निर्णयात कोल्हापूरचे माननीय जिल्हाधिकारी यांना या प्रकल्पासाठी ‘योग्य अटी व शर्ती’ (Suitable Conditions) निश्चित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. ‘आयटॅक’ने या शासन निर्णयाचे जोरदार स्वागत केले असून, कोल्हापूरच्या आयटी क्षेत्राच्या विकासातील हे ‘पहिले आणि सर्वांत मोठे यश असल्याचे म्हटले आहे.

या ऐतिहासिक निर्णयावर ‘आयटॅक’च्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका आणि कृतज्ञता व्यक्त केली.

कोल्हापूरच्या आयटी पार्कचा शासन निर्णय (GR) अधिकृतरीत्या प्रसिद्ध झाला आहे, हा आमच्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. या संपूर्ण प्रक्रियेत राज्याचे नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार अमल महाडिक यांनी शासनाकडे जो भक्कम पाठपुरावा केला, त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे आणि दूरदृष्टीमुळेच आज हे पहिले मोठे यश आपल्याला मिळाले आहे.

प्रताप पाटील, अध्यक्ष, आयटॅक (ITAK)

जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश; आता स्थानिक कंपन्यांसाठी जागा ‘राखीव’ ठेवण्याची प्रमुख मागणी!
हा GR म्हणजे ‘आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर’च्या प्रदीर्घ लढ्याचे पहिले फळ आहे. या प्रक्रियेत जिल्हाधिकारी महोदयांनी जे विशेष प्रयत्न केले आणि सकारात्मक भूमिका घेतली, त्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. या शासन निर्णयात जिल्हाधिकाऱ्यांना अटी व शर्ती निश्चित करण्याचे जे अधिकार दिले आहेत, ती आमच्यासाठी एक अत्यंत जमेची बाजू आहे. आता यापुढील प्रक्रियेत या नवीन आयटी पार्कमध्ये ‘स्थानिक आयटी कंपन्यांना भूखंड वाटपात सर्वोच्च प्राधान्य आणि राखीव जागा’ (Preference and Reservation for Local IT) असावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. जिल्हाधिकारी या अटीचा समावेश करून कोल्हापूरच्या मातीत रुजलेल्या ३७२ स्थानिक आयटी कंपन्यांना खऱ्या अर्थाने न्याय देतील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.

राहुल मेंच, सचिव, आयटॅक (ITAK)

कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेला आणि गुंतवणुकीला नवी गती देणारा निर्णय !
आयटी पार्कचा हा शासन निर्णय कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेसाठी ‘गेम-चेंजर’ ठरणार आहे. जेव्हा आपल्या स्थानिक आयटी कंपन्यांना या पार्कमध्ये प्राधान्याने जागा मिळेल, तेव्हा कोट्यवधी रुपयांची थेट गुंतवणूक आणि बौद्धिक संपदा (Intellectual Property) कोल्हापुरातच राहील. यामुळे केवळ हजारो उच्चशिक्षित तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगारच मिळणार नाही, तर शहराचा महसूल आणि दरडोई उत्पन्न (Per Capita Income) वाढून जिल्ह्याच्या संपूर्ण अर्थकारणाला एक मोठी चालना मिळेल.

रणजित नार्वेकर, खजिनदार, आयटॅक (ITAK)

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

3 hours ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

23 hours ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

1 day ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

2 days ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

2 days ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

2 days ago