काय चाललयं अवतीभवती

कोल्हापूर आयटी पार्क राज्यासाठी ‘रोल मॉडेल’ ठरणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

स्थानिक आयटी कंपन्यांना प्राधान्य, गरज पडल्यास MIDC नियमांत बदल

कोल्हापूर : शेंडा पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या आयटी पार्कमधील सर्व अडचणी शासन स्तरावरून दूर करून प्रकल्पाला गती दिली जाईल. आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर (ITAK), स्थानिक प्रशासन आणि शासन यांच्यात समन्वय साधून कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येईल. राज्यातील प्रस्तावित ३५ आयटी पार्क्ससाठी कोल्हापूरचा हा प्रकल्प ‘रोल मॉडेल’ ठरेल, अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

ITAKच्या वतीने आयोजित विशेष सादरीकरण बैठकीत ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष प्रताप पाटील आणि सचिव राहुल मेंच यांनी शेंडा पार्क आयटी झोनची अत्याधुनिक ब्लूप्रिंट सादर केली. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय कोल्हापुरात ५०० हून अधिक आयटी कंपन्या कार्यरत असून सुमारे ११ हजार रोजगार निर्माण झाल्याची माहिती त्यांनी दिली. याबद्दल उपस्थित मान्यवरांनी कौतुक व्यक्त केले.

स्थानिकांना प्राधान्य; नियम बदलण्याची तयारी
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्थानिक आयटी उद्योजकांना प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. “बाहेरील कंपन्यांची वाट पाहण्याऐवजी स्थानिक ५०० कंपन्यांनाच जागा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. गरज पडल्यास MIDCच्या नियमांमध्ये बदल करण्याचीही तयारी आहे,” असे त्यांनी सांगितले.

महानगरपालिकेचा पाठिंबा
महापौरांनीही आयटी पार्कसाठी पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. “स्थानिक कंपन्यांनाच प्रथम प्राधान्य दिले जाईल. आयटी पार्क लवकर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित व्हावे यासाठी महानगरपालिका सर्वतोपरी मदत करेल,” असे त्यांनी नमूद केले.

प्रशासनाची १००% सहकार्याची हमी
MIDCचे प्रादेशिक अधिकारी आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी पायाभूत सुविधा व प्रशासकीय प्रक्रियेत पूर्ण सहकार्य देण्याची हमी दिली.

मोठ्या प्रमाणावर उपस्थिती
या सादरीकरणाला आयटी उद्योजक, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ, औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी आणि माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कोल्हापूरच्या आयटी क्षेत्राला नवे बळ मिळाले आहे.

२०३५ पर्यंत मोठी झेप
योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास २०३५ पर्यंत कोल्हापुरात ७० हजार उच्चशिक्षित रोजगार आणि ९,५०० कोटींची उलाढाल निर्माण करण्याचा विश्वास ITAKने व्यक्त केला.

संपर्क :
प्रताप पाटील (अध्यक्ष, ITAK) – ९६३७९६३३४४
राहुल मेंच (सचिव, ITAK) – ९४२२४१६३३५

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

जागतिक अर्थकारणाच्या नव्या समीकरणांचा वेध घेणारे ‘ब्रिक्स अँड इंडिया’ ‘BRICS & INDIA: PROSPECTS & CHALLENGES

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…

1 hour ago

गुरूंचे “भिऊ नकोस” हे आश्वासन…

दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…

13 hours ago

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

1 day ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

1 day ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

2 days ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

2 days ago