मुक्त संवाद

‘माझी ईडी चौकशी’ : विनोदातून जीवनाकडे पाहण्याची प्रसन्न दृष्टी

गंभीर विषयांकडेही खेळकरपणे पाहत वाचकांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणारे लेखक सुनील पांडे यांच्या ‘माझी ईडी चौकशी’ या विनोदी कथासंग्रहाचे ज्येष्ठ संपादक, कवी आणि लेखक श्रीराम ग. पचिंद्रे यांनी कौतुक केले आहे. पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेल्या पांडे यांच्या या चौथ्या विनोदी कथासंग्रहातील कथा केवळ रंजन करणाऱ्या नसून, जीवनातील विसंगतींवर भाष्य करत वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या आहेत. “विनोदी लेखन ही कला नाही, तर ती एक साधना आहे,” असे पांडे यांनी मनोगतात म्हटले आहे.

सुनील पांडे हे बहुआयामी आणि बहुप्रसव लेखक आहेत. त्यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ही सर्व पुस्तके भिन्न- भिन्न आकृतीबंधाची आहेत. तथापि, सर्व पुस्तकांमध्ये वाङ्मयीन गुणांची पखरण आहे.

माझी ईडी चौकशी' हा त्यांच्या चार विनोदी कथासंग्रहापैकी एक आहे. हेच शीर्षक असलेली कथा ह्या संग्रहात प्रथम आहे. गेल्या काही वर्षांत आपल्या देशात 'ईडी'ची प्रचंड चर्चा आहे, 'ईडी' धास्ती विशिष्ट वर्गात आहे, त्यामुळे शीर्षकापासूनच वाचकाच्या मनात कुतूहल निर्माण होते, पण कथा वाचून संपताच मन प्रसन्न होऊन जाते. ही अनुभूती सर्वच कथा वाचून झाल्यावर येते.

मराठीत श्री. कृ. कोल्हटकर, चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, वि. आ. बुवा इत्यादी थोर लेखकांनी विनोदी लेखनाचा मानदंड निर्माण केलेला आहे. सुनील पांडे हे आपल्या कसदार विनोदी लेखनाने ह्या परंपरेचे पाईक ठरलेले आहेत. जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे खेळकरपणे पाहण्याची दृष्टी विनोदी लेखकाच्या ठायी असली पाहिजे; तशी ती पांडे यांच्याकडे निश्चितच आहे. विनोदबुद्धी ही नैसर्गिक देणगी आहे. ती प्रत्येक लेखकाला ओढूनताणून आणता येत नाही. पांडे यांना ती उपजतच लाभलेली आहे, हे त्यांच्या कथा वाचताना जाणवते.

- श्रीराम ग.पचिंद्रे,
ज्येष्ठ संपादक, कवी आणि लेखक
कोल्हापूर.

लेखकाचे मनोगत

विनोदी लेखन ही कला नाही तर ती एक साधना

माझी ईडी चौकशी हा माझा चौथा विनोदी कथासंग्रह.या कथासंग्रहातील कथा विनोदी असल्या तरी त्याला तितकीच गंभीरतेची झालर आहे. केवळ विनोदासाठी विनोद सांगणे हा या कथांचा उद्देश नाही. विनोदी लेखन ही फक्त कला नाही तर ती एक साधना आहे.

विनोदी लेखन करणाऱ्या लेखकाला जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे खेळकर दृष्टीने पाहता आले पाहिजे. गंभीर वातावरणही विनोदी दृष्टीने बदलून जाते.

टवाळा आवडे विनोद असे जरी म्हटले जात असले तरी त्यात काही तथ्य नाही. विनोदाने मनुष्य जीवन सुसह्य होत असते हे नाकारुन चालणार नाही. विनोद नुसते रंजन करत नाही तर तो अंतर्मुख करणारा आणि प्रबोधन करणाराही असतो हे विसरून चालणार नाही.

ताणतणाव आणि नैराश्यापासून सुटका हवी असेल तर जीवनात विनोद हवाच. आज हास्यकल्ब ही किती आवश्यक आहे हे आपण सगळे पाहतो आहे. विनोद नुसता माणसाला हसवत ठेवत नाही तर निरोगीही ठेवतो. आचार्य प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे , द. मा. मिरासदार , वि. आ. बुवा अशा कितीतरी विनोदी लेखकांनी आम्हाला हसायला शिकवले आहे.

या कथासंग्रहातील कथा लिहिताना आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांनी मला विनोदी लेखनासाठी विषय पुरवले. कल्पना आणि वास्तव यांचा मेळ घालत या कथा मी लिहिल्या. त्यामुळे या कथा पूर्णतः काल्पनिक आहे असे मी म्हणणार नाही. बालपण देगा देवा ही कथा तशी पूर्णतः फैन्टसी कथा आहे.

- सुनील पांडे
सिंधुप्रभा
मु. पो. नीरा, ता. पुरंदर, जि. पुणे. पिन. ४१२१०२.
मो ९८१७८२९८९८ .

पुस्तकाचे नाव – माझी ईडी चौकशी ( विनोदी कथासंग्रह )
लेखक – सुनील पांडे
प्रकाशकनावीन्य प्रकाशन, पुणे.
पाने : १०६
किंमत : २००
पुस्तकासाठी संपर्क : ९८२२९३९४४६

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

दरवाढीमागे इथेनॉल नव्हे धोरणातील विसंगती कारणीभूत ! sugar Price Rise Issue

विशेष आर्थिक लेख... सणासुदीच्या तोंडावर साखरेने ग्राहकांना अक्षरशः ‘कडू’ धक्का दिला आहे. देशातील अनेक बाजारांत…

3 hours ago

ब्रिक्स परिषदेतून सांस्कृतिक कूटनीतीचा नवा अध्याय Cultural Diplomacy and Global Cooperation: BRICS Global Impact Forum 2

सांस्कृतिक संवादातून जागतिक सहकार्याची नवी दिशा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका म्हणजेच ‘ब्रिक्स’…

12 hours ago

भूजल आटत आहे, नद्या प्रदूषित होत आहेत; भारताचे जलभविष्य काय? India water crisis sustainable water management

भारताच्या लोकसंख्येचा वाढता भार, हवामान बदलाचे परिणाम, भूजलाचा अतिरेकी उपसा आणि पाण्याचे अकार्यक्षम व्यवस्थापन यामुळे…

1 day ago

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास अन् रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे Shivaji Maharaj: A Warrior of Extraordinary Military Strategy

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन कोल्हापूर -…

1 day ago

एकांतातील ज्ञानाची त्रिजगतातील गर्जना

गुरू आणि शिष्य यांचा एकांतातील संवाद हा केवळ दोन व्यक्तींमधील उपदेश नसतो; तो आत्मज्ञानाच्या अनंत…

2 days ago

देव शोधण्यासाठी मंदिरातच का जावे? ज्ञानेश्वर माऊलींना काय वाटते ?

देव कुठे आहे? मंदिराच्या गाभाऱ्यात, एखाद्या मूर्तीत, की आपल्या जीवनाच्या वाटेवर भेटणाऱ्या प्रत्येक जीवामध्ये? हा…

2 days ago