विश्वाचे आर्त

संसारातील अनित्यता ओळखूण त्यानुसार जीवनात बदल करणेच हाच संन्यास

संसारात काय अनित्यता आहे. हे जाणणे. ओळखणे व त्यानुसार आपल्या जीवनात बदल करणे हा संन्यास आहे. संसाराचा त्याग करून हिमालयात गेला तरी दररोजच्या जेवणाची चिंता असतेच. यासाठी कष्ट हे करावेच लागतात. हिमालयात गेला तर फक्त वातावरण बदलते इतकाच काय तो बदल होतो. मग घरदार सोडण्याचा फायदा काय? हिमालयात जाऊन जे करणार ते घरात राहूनही करू शकतोच ना? संसारात राहूनही संन्यस्थ जीवन जगता येते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल 9011087406

तैसी संसारा या समस्ता । जाणिजे जैं अनित्यता ।
तैं वैराग्य दडवितां । पाठीं लागे ।। ३९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा

ओवीचा अर्थ – त्याप्रमाणें या सर्व संसाराला अनित्यता आहे, असे ज्या वेळेला कळेल, त्यावेळी वैराग्याला घालवून दिले तरी, तें वैराग्य आपण होऊन साधकाच्या पाठीमागे लागेल.

मासे जसे पाण्याबाहेर काढल्यानंतर जिवंत राहण्यासाठी तडफडतात. तसे मनुष्य जगण्यासाठी तडफडत आहे. हे सर्वसामान्यांचे जीवन पाहून सम्राटाच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले. साम्राज्याचा त्याग त्याने केला. मिळालेले ऐश्वर्य त्यागणे तितकी सोपी गोष्ट नाही. आरामात जीवन जगताना वैराग्य उत्पन्न होणे सहज घटना नाही. पुढे हा सम्राट बुद्ध झाला.

मुंबईतील लोकलची गर्दी पाहून रेल्वे स्थानकावरूनच खेडूताने गावचा रस्ता पकडला. त्यात आश्चर्यासारखे काही नाही. शहरातील जीवन हे असे धावपळीचे आहे. गावाकडे कष्टाचे जीवन असले तरी अशी धावपळ नसते. त्यात एक शांती असते. समाधान असते. शेतात राबल्यानंतर दुपारची भाकरी खाऊन झाडाखाली निवांत पडले असता गाढ झोप लागते. शहरात असे होत नाही. पण शहराला सोडणे हा त्याग नाही? ही तेथील जीवनाची दगदग पाहून काढलेली पळवाट आहे. हा संन्यास होत नाही. हे वैराग्य तर निश्चितच नव्हे.

कामावरून आले तरी घरात शांतता नसते. एकतर सतत टीव्ही सुरू असतो. शांत पडावे म्हटले तरी पडता येत नाही. तरीही आपण ते जीवन जगतो. त्याचा आनंद उपभोगत असतो. पूर्वीच्या काळीही नगरातील जीवन हे असेच धावपळीचे होते. जगण्यासाठी धडपड होती. संसार म्हटले की चिंता ह्या आल्याच. मुलांची चिंता, आई-वडिलांची चिंता, काही ना काही चिंतेचा विषय जरूर असतोच. कोणी आजारी असेल तर त्याची चिंता. स्वतः आजारी असलो तर स्वतःची चिंता. मन सतत अशाने विचलित होत राहते. काहींना हा विचार इतका मनाला लागतो की ते या संसाराचा त्याग करतात. घरच्या कटकटीतून बाहेर पडावे यासाठी संसाराचा त्याग म्हणजे पळवाट आहे.

संसारात काय अनित्यता आहे. हे जाणणे. ओळखणे व त्यानुसार आपल्या जीवनात बदल करणे हा संन्यास आहे. संसाराचा त्याग करून हिमालयात गेला तरी दररोजच्या जेवणाची चिंता असतेच. यासाठी कष्ट हे करावेच लागतात. हिमालयात गेला तर फक्त वातावरण बदलते इतकाच काय तो बदल होतो. मग घरदार सोडण्याचा फायदा काय? हिमालयात जाऊन जे करणार ते घरात राहूनही करू शकतोच ना? संसारात राहूनही संन्यस्थ जीवन जगता येते. त्यासाठी हिमालयात जाण्याची गरज नाही.

संसार होत असतो तो करावा लागत नाही. परमार्थ मात्र करावा लागतो. दैनंदिन कामकाज हे प्रत्येकालाच करावे लागते. राजा असला तरी त्याला त्याचे काम करावेच लागते. रंकात राहत असणाऱ्या नागरिकालाही काम हे करावे लागते. ते टाळता येणे शक्य नाही. ही दैनंदिन गरज आहे. अमाप संपत्ती असली तरी ती सांभाळण्याचे काम तरी त्याला करावेच लागते ना? हे काम आपोआप होत असते. संसारातील अनित्यता जो ओळखतो तो काही न करता परमार्थाच्या वाटेवर येतो.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

ओअँसिसचा हिरवा श्वास अन् सहाराच्या वादळाचा काळा कहर The green breath of the oasis

सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने…

8 hours ago

क्षणाचाही विलंब नको : ज्ञानेश्वरीतील संन्यासयुक्तीचा सहज, सोपा आणि जीवनाला दिशा देणारा संदेश A message that gives direction to life

"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…

12 hours ago

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…

2 days ago

अयोध्येतील दानपेटी प्रकरण : श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कसोटी Ram Mandir Donation Box Case

स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…

2 days ago

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

3 days ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

4 days ago