स्पर्धा परीक्षा, शिक्षण

एसआयएसीमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

लोकाभिमुख प्रशासनाची जाणीव ठेवून कार्य करावे – चंद्रकांतदादा पाटील

पुणे : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) या देशातील प्रख्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची जडणघडण करणाऱ्या संस्थेमध्ये भारतीय नागरी सेवा तसेच भारतीय वनसेवा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम २६ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता.

सन २०२५ मधील भारतीय नागरी सेवा परीक्षेत संस्थेच्या २५ विद्यार्थ्यांनी, तर भारतीय वनसेवा परीक्षेत १४ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. संस्थेच्या संचालिका डॉ. भावना पाटोळे यांच्या नेतृत्वामध्ये हे यश साकार झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना मंत्र्यांनी विद्यार्थ्यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून जबाबदारीची जाणीव ठेवून समाजकल्याण व लोककल्याणाच्या उद्देशाने कार्य करावे, असे आवाहन केले. आपल्या कार्यातून लोकाभिमुख आणि लोकप्रिय अधिकारी म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात संस्थेच्या संचालिका डॉ. भावना पाटोळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आज प्रशासन क्षेत्रात प्रवेश करणारे विद्यार्थी भविष्यात देशाचे प्रशासन अधिक सक्षमपणे कार्यान्वित करत राष्ट्रनिर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी डॉ. शैलेन्द्र देवळाणकर, उच्च शिक्षण विभागाचे संचालक, डॉ. बोऱ्हाडे, सहसंचालक (पुणे), डॉ. राऊत, सहसंचालक (मुंबई) तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. पंचीकर यांनी केले.

स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील जाणकार म्हणून ओळख असलेले डॉ. शैलेन्द्र देवळाणकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. समाजकल्याण व लोककल्याणाचा दृष्टिकोन जोपासत आदर्श प्रशासन उभारण्यात विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे, असा संदेशही यावेळी देण्यात आला.

संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी पर्वात मिळालेले हे यश विशेष उल्लेखनीय मानले जात असून, एसआयएसीची कामगिरी प्रशासकीय प्रशिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

5 hours ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

17 hours ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

1 day ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

1 day ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

2 days ago

स्त्रीवादी साहित्याची नवी दिशा : डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांचे अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषण New direction of feminist literature

स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…

2 days ago