स्पर्धा परीक्षा, शिक्षण

एसआयएसीमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

लोकाभिमुख प्रशासनाची जाणीव ठेवून कार्य करावे – चंद्रकांतदादा पाटील

पुणे : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) या देशातील प्रख्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची जडणघडण करणाऱ्या संस्थेमध्ये भारतीय नागरी सेवा तसेच भारतीय वनसेवा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम २६ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता.

सन २०२५ मधील भारतीय नागरी सेवा परीक्षेत संस्थेच्या २५ विद्यार्थ्यांनी, तर भारतीय वनसेवा परीक्षेत १४ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. संस्थेच्या संचालिका डॉ. भावना पाटोळे यांच्या नेतृत्वामध्ये हे यश साकार झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना मंत्र्यांनी विद्यार्थ्यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून जबाबदारीची जाणीव ठेवून समाजकल्याण व लोककल्याणाच्या उद्देशाने कार्य करावे, असे आवाहन केले. आपल्या कार्यातून लोकाभिमुख आणि लोकप्रिय अधिकारी म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात संस्थेच्या संचालिका डॉ. भावना पाटोळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आज प्रशासन क्षेत्रात प्रवेश करणारे विद्यार्थी भविष्यात देशाचे प्रशासन अधिक सक्षमपणे कार्यान्वित करत राष्ट्रनिर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी डॉ. शैलेन्द्र देवळाणकर, उच्च शिक्षण विभागाचे संचालक, डॉ. बोऱ्हाडे, सहसंचालक (पुणे), डॉ. राऊत, सहसंचालक (मुंबई) तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. पंचीकर यांनी केले.

स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील जाणकार म्हणून ओळख असलेले डॉ. शैलेन्द्र देवळाणकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. समाजकल्याण व लोककल्याणाचा दृष्टिकोन जोपासत आदर्श प्रशासन उभारण्यात विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे, असा संदेशही यावेळी देण्यात आला.

संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी पर्वात मिळालेले हे यश विशेष उल्लेखनीय मानले जात असून, एसआयएसीची कामगिरी प्रशासकीय प्रशिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

5 hours ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

5 hours ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

14 hours ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

15 hours ago

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…

1 day ago

कोल्हापूरच्या युवा दिग्दर्शकाच्या ‘अनघा’ला जम्मू फिल्म फेस्टिव्हलची पसंती

https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…

2 days ago