विश्वाचे आर्त

अध्यात्म हे शाश्वत सुख देणारे शास्त्र

परी हेचि आत्मसिद्धि । जो कोणी भाग्यनिधि ।
श्रीगुरुकृपालब्धि – । काळी पावे ।। ९८४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – परंतु जो कोणी भाग्याचा केवळ ठेवा असलेला पुरूष, सद्गुरूकृपेचा नाश होण्याच्यावेळी ही आत्मसिद्धि पावतो.

प्रत्येक साधकाची आत्मज्ञानी होण्याची, आत्मसिद्धि मिळवण्याचीच इच्छा असते. यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू असतात. पण हे भाग्य सर्वानाच मिळते असे नाही. सद्गुरू हे सर्वांना आत्मज्ञानी करण्यासाठी नित्य प्रयत्नशिल असतात. विविध अनुभव देऊन साधकाला ते जागे करत असतात. सावध करत असतात. या आत्मज्ञानाची अनुभुती साधक घेऊनही तो विषयांमुळे अतिम ध्येयापर्यंत जाण्यास वारंवार अपयशी ठरत असतो. असे असले तरी सद्गुरुंच्याकृपेने त्यांच्या आशिर्वादाने अन् मार्गदर्शनाने साधक अपेक्षित ध्येय गाठतोच.

सद्गुरु हे कृपेने उपदेश करत असतात. त्यांची कृपा होऊनही साधक सावध नसतो. पण सद्गुरु हे इच्छा सोडीत नाहीत. त्यांचे प्रयत्न हे सुरूच राहातात. कारण साधकांच्या सिद्धतेतच त्यांची सिद्धी असते. साधकाचे दृढसंकल्प वारंवार ढळत असतात. वारंवार साधक अपयशी ठरत असतो. तरीही त्याला ते प्रोत्साहित करत असतात. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, असे सांगून ते वारंवार साधकाला यशाच्या वाटेवर ओढीत असतात. यशाचा डोंगर चढणे अवघड असले तरी साधकाला प्रवासात येणारे सर्व अडथळे सद्गुरु दूर करण्याचा प्रयत्न करत असतात.

साधनेमध्ये दृढसंकल्प, दृढनिश्चय महत्त्वाचा असतो. ध्येय गाठायचे असेल तर मनाचा दृढनिश्चय हवा. शांत बुद्धीने कार्यभाग साधायला हवा. क्रोधामुळे किंवा मनाला सुटलेली हाव, लोभ यामुळे लक्ष्य विचलित होते. अभ्यासात एकाग्रता ही खूप महत्त्वाची आहे. एकाग्रतेने केलेला अभ्यास लक्षात राहातो. अन् यशाचा मार्ग सोपा होतो. यासाठीच मनाला चांगल्या विचारात गुंतवण्याचा प्रयत्न करायला हवा. मनाला तशी सवय लावायला हवी. विषय, वासना उत्पन्न होतच राहातात. जगतर अशा मोहमायेने भरलेले आहे. प्रत्येकाला त्याची हाव सुटली आहे, असे नसते तर इतके प्रदुषण कधीच झाले नसते. माणसाच्या गरजा विचारात घेऊन माणसाने जगायचे ठरवले असते तर तो खूपच सुखी झाला असता. पण तसे होत नाही. विकास ज्याला म्हणतो तो विकास नसून मोठा विकार आहे, हे माणसाच्या लक्षातच येत नाही. पण अशानेच त्यांचे जीवन हे धकाधकीचे, धावपळीचे झाले आहे. क्षणिक सुखाला तो शाश्वत सुख समजू लागला आहे. असेच चित्र आज सर्वत्र पाहायला मिळते आहे. पण यात राहायचे तर आपणासही बदलत्या काळानुसार, जगानुसार बदलत राहावे लागणार आहे. पण हे शाश्वत नाही, हे न विसरता शाश्वत सुखाच्या शोधात आपण नित्य असायला हवे. अध्यात्म हे शाश्वत सुख देणारे शास्त्र आहे.

जीवनशैली बदलत्याकाळानुसार बदल होत आहेत. ते बदल स्वीकारत आपणास वाटचाल करावी लागणार आहे. क्षणिक सुखाच्या मोहात मानव अधिकच गुरफटला आहे. त्याच्या डोळ्यांना अन् मनाला याची धुंदी चढली आहे. यातून तो जागे होणे तितके साधे नाही. पण सद्गुरु त्याला या शाश्वत सुख देणारे अध्यात्म समजावत आहेत. यातून जो जागा होतो, सावध होतो तोच आत्मसिद्धी मिळवतो. यासाठी जागे होऊन शाश्वत सुखाचे धनी होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

‘मुक्त’ विद्यापीठाची वाटचाल खासगीकरणाकडे ? Open University moving towards privatization

गरीब, ग्रामीण आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी स्थापन झालेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आता खाजगी संस्थांच्या…

15 hours ago

भारतीयत्व म्हणजे नेमके काय ? उत्तर सापडते भारतीय संविधानात ! Indianness ? The answer found in the Constitution !

भारतीयत्वाची माझी संकल्पना… आपण भारतीय आहोत म्हणजे काय आहोत ? आपला जन्म भारतामध्ये झाला आहे,…

16 hours ago

विशेष आर्थिक लेखः राज्यांच्या वित्तीय कसरतीचे वास्तव गंभीरच Financial Reality of the states

देशातील बहुतेक सर्व राज्य सरकारांची आर्थिक स्थिती बऱ्याच प्रमाणात चिंताजनक आहे. प्रत्येक राज्याची स्थिती पाहिल्यास…

1 day ago

हुकूमाचा एक्का नि भाऊचा धक्का…ऑपरेशन टायगरने उबाठाची झोप उडवली Ekanath Shinde Operation Tiger

सहा खासदारांच्या पक्षांतराचा धक्का अजूनही सावरता न आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता विधान परिषदेचे…

2 days ago

प्रेमाने केलेले प्रत्येक कर्तव्य हीच खरी पूजा True Worship

मनुष्याला मोक्ष मिळण्यासाठी जन्म, जात, कुल, विद्वत्ता किंवा बाह्य कर्मकांड यांपेक्षा अंतःकरणातील निखळ प्रेम अधिक…

2 days ago

तुळजापूर येथील जागर साहित्य पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन Call for Jagar Literary Award In Tuljapur

तुळजापूर : मराठवाडा साहित्य परिषद, शाखा तुळजापूर यांच्या वतीने 'जागर साहित्य पुरस्कार' जाहीर करण्यात आला…

3 days ago