काय चाललयं अवतीभवती

शेती शोध आणि बोध या सचिन होळकर यांच्या पुस्तकास शासनाचा पुरस्कार

सचिन होळकर यांच्या पुस्तकाला राज्य सरकारचा एक लाख रुपयाचा पुरस्कार जाहीर..

राज्य सरकारचे 2021 सालचे महाराष्ट्र राज्य वाङ्ममय पुरस्कार अंतर्गत कृषी व कृषीपूरक लिखाण, साहित्यासाठी वसंतराव नाईक पुरस्कार लासलगाव येथील कृषीतज्ञ व ख्यातनाम लेखक सचिन आत्माराम होळकर यांच्या “शेती शोध आणि बोध” या पुस्तकाला जाहीर झाला.

शेती क्षेत्रातील विविध समस्या व त्यांवरील उपाय योजना आणि शेतकऱ्यांची वस्तुस्थितीचा आढावा घेणार त्यांचं शेती शोध आणि बोध हे सहावं पुस्तक राज्य पुरस्कारासाठी निवडले आहे. या पुस्तकामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी, करार शेती, दुग्ध उत्पादन, द्राक्ष उत्पादन, शेतमजुरांच्या समस्या, यशोगाथांची सत्यता, आर्थिक चक्रव्यूवहात अडकलेला शेतकरी, संकरित वाण, रासायनिक खते, कृषी कर्ज वितरण, सरकारी अनुदान, वनशेती, सेंद्रिय शेती इतर अनेक विषयांचा सखोल उहापोह केला आहे.

पुस्तकाबद्दल बोलताना सचिन होळकर म्हणाले, पीक उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर लिखाण नेहमीच सुरू असते, मात्र शेतीचे प्रश्न इथे थांबत नाही. शेतीच्या गरजा आणि समस्या खूप मोठ्या आहेत. हे सर्व पाहता त्या प्रश्नांना खरा हात घालण्याची फार दिवसांची इच्छा होती. उत्पादन तंत्रज्ञानाच्या बाबतीत शेतकरी बऱ्यापैकी स्थिर झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही. मात्र धोरण बदलण्याची गरज आहे. याशिवाय शेती करताना अनेक बाबी डोळसपणे बघायला पाहिजे. या सर्व बाबींचा ऊहापोह लेखन करून मी सुरुवात केली. त्यानंतर मात्र राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी मला फोनवरून संपर्क साधायला सुरुवात केली. त्यांच्या प्रश्नांना आणि समस्यांना मर्यादा नव्हती माझ्या लिखाणाला देखील मी कोणतीही मर्यादा घालून ठेवत नाही. राज्यातील अनेक शेतकरी नियमित माझ्या संपर्कात असतात. त्यांच्या जिज्ञासूपणाचं कौतुक करावसं वाटतं. मात्र माझे इतर सर्व विषयांचे वैचारिक स्वरूपाचे लेख सर्वांनाच सर्वत्र उपलब्ध होऊ शकत नाही. अर्थात ते पाठवणे मला ही शक्य होणार नाही. अनेक वाचकांचे फोन आल्यावर ते या विषयावर तुमचं काय मत आहे? किंवा या विषयावर तुम्ही लिखाण करा अशी विचारणा होते. मात्र त्याच विषयावरील माझा प्रसिद्ध होऊन गेलेला लेख त्यांच्या वाचनात आलेला नसतो हे ऐकून दुःख होते. म्हणून माझ्या अनेक प्रसिद्ध अप्रसिद्ध लेखांचा पुस्तकरूपी संग्रह असावा असं वाटायला लागलं व त्यात अनेक शेतकरी मित्रांनी तशी कल्पना देखील सुचवली आणि त्यातून माझ्या ह्या “शेती शोध आणि बोध” ह्या पुस्तकाचा जन्म झाला.

सचिन होळकर हे सुवर्णपदकासह कृषी पदवीधारक असून त्यांनी आजवर सात पुस्तकांचे लिखाण केले आहे याशिवाय महाराष्ट्रातील विविध नियतकालिकांमधून, वृत्तपत्रांमधून जवळपास 500 पेक्षा अधिक लेख त्यांचे प्रसिद्ध आहेत. आकाशवाणी नाशिक, आकाशवाणी औरंगाबाद, रेडिओ वसुंधरा बारामती, गावकरी कृषिमंच इत्यादि अनेक माध्यमातून त्यांचे मार्गदर्शनपर कार्यक्रम देखील झाले आहेत. त्यांच्या शेती आणि सामाजिक कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शेतीमित्र पुरस्कारा व्यतिरिक्त इतर नामांकित संस्थेचे त्यांना 40 पुरस्कार प्राप्त आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

‘मुक्त’ विद्यापीठाची वाटचाल खासगीकरणाकडे ? Open University moving towards privatization

गरीब, ग्रामीण आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी स्थापन झालेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आता खाजगी संस्थांच्या…

15 hours ago

भारतीयत्व म्हणजे नेमके काय ? उत्तर सापडते भारतीय संविधानात ! Indianness ? The answer found in the Constitution !

भारतीयत्वाची माझी संकल्पना… आपण भारतीय आहोत म्हणजे काय आहोत ? आपला जन्म भारतामध्ये झाला आहे,…

16 hours ago

विशेष आर्थिक लेखः राज्यांच्या वित्तीय कसरतीचे वास्तव गंभीरच Financial Reality of the states

देशातील बहुतेक सर्व राज्य सरकारांची आर्थिक स्थिती बऱ्याच प्रमाणात चिंताजनक आहे. प्रत्येक राज्याची स्थिती पाहिल्यास…

1 day ago

हुकूमाचा एक्का नि भाऊचा धक्का…ऑपरेशन टायगरने उबाठाची झोप उडवली Ekanath Shinde Operation Tiger

सहा खासदारांच्या पक्षांतराचा धक्का अजूनही सावरता न आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता विधान परिषदेचे…

2 days ago

प्रेमाने केलेले प्रत्येक कर्तव्य हीच खरी पूजा True Worship

मनुष्याला मोक्ष मिळण्यासाठी जन्म, जात, कुल, विद्वत्ता किंवा बाह्य कर्मकांड यांपेक्षा अंतःकरणातील निखळ प्रेम अधिक…

2 days ago

तुळजापूर येथील जागर साहित्य पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन Call for Jagar Literary Award In Tuljapur

तुळजापूर : मराठवाडा साहित्य परिषद, शाखा तुळजापूर यांच्या वतीने 'जागर साहित्य पुरस्कार' जाहीर करण्यात आला…

3 days ago