शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रानभाज्याच्या जगातील आरोग्य संस्कृती

रानभाज्या म्हणजे सर्वांचे जीवप्राण असेच म्हणावे लागेल. या रानभाज्यांची माहिती ग्रामीणांना आहे आता लिखित रुपात ती शहरापर्यंत पोहचेल. नागरीकरणामुळे खानपान, रहनसहन, व्यस्त, दगदग, धावपळीचे जीवन यामुळे आरोग्यावर होत असलेले विपरीत परिणाम सारेच भोगत आहेत. परंतु नैसर्गिक रितीने उगवलेल्या म्हणजेच बिनाखताच्या या रानभाज्या आरोग्यसंवर्धनासह मानसिक स्वास्थ देणाऱ्या ठरु शकतात.

कुसुमताई अलाम, गडचिरोली
7218712126

अनेक लोकं जगतात संपतात पण आपल्या अवतीभवती काय आहे याचे भान नसते. पण काही असे असतात ते आपल्या माणसांवर, परिसरातील, सभोवताली असलेल्या जगण्या वागण्यावर लक्ष ठेवून असतात. संगीता ठलाल अशीच आहे. लेखनाच्या विशेषतः झाडीबोली साहित्याच्या माध्यमातून काही वर्षांपासून ओळख झाली. ती वाढत गेली. या त्या कारणाने रुजत गेली. तशी ती समजत गेली. तिचा स्वभाव, साधेसरळपणे जीवन जगताना सामाजिक भान तिच्यात आले.लेखणीतून ती व्यक्त होत राहिली. कोणत्याही साहित्यिक चौकटीत न राहून मोकळेपणाने ती लिहिते आहे. हे भान तिला शेतीतून मिळाले असे मला वाटते.

ती स्वतः ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील आहे. दलित आदिवासी, शेतकरी समाज यांच्या सहवासातून ती गेली आहे. सामुहिकतेवर आधारित हा ग्रामीण समाज तिच्या अंगवळणी पडला आहे हे तिच्या लेखणीतून, वागण्यातून जाणवतो. हा समाज सभोवतालच्या परिसरावर अवलंबून असणारा आहे. शेती, जंगल ही शाश्वत रोजगार देणारी साधने यावर जगणारा समाज या समाजाची ती एक घटक आहे. म्हणुन ती शेती जंगलावर निगराणी ठेवून आपल्या पोशिंद्याचे आभार मानते. ती जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा गाभा असलेल्या रानभाज्यांच्या जगात सर्वांना घेऊन जाते. रानभाज्या ह्या केवळ भाज्या नाहीत तर आरोग्य संजिवनी आहेत. संगीता कृषीप्रधान सहजीवन पद्धतीची लोक संस्काराची शिदोरी बांधून सर्वांच्या आरोग्याची काळजी घेते.

गडचिरोली जिल्हा हा जंगल व्याप्त आहे. आणि या जंगलात विविध वनस्पतींच्या अत्यंत उपयुक्त प्रजाती आहेत. वर्षानुवर्षे खाण्यासाठी, औषधांसाठी या वनस्पतीचा वापर करून येथील सर्वसामान्य माणूस आपले जीवन जगत आहे. संगीताने याची ओळख लेखणीतून करून दिली आहे यास्तव ती कौतुकास पात्र आहे. विविधतेने नटलेला हा जिल्हा, येथे विविध बोलीभाषा, वेगवेगळ्या चालीरिती रुढी परंपरा संस्कृती खानपान आहे. पण या रानभाज्या म्हणजे सर्वांचे जीवप्राण असेच म्हणावे लागेल. या रानभाज्यांची माहिती ग्रामीणांना आहे आता लिखित रुपात ती शहरापर्यंत पोहचेल. नागरीकरणामुळे खानपान, रहनसहन, व्यस्त, दगदग, धावपळीचे जीवन यामुळे आरोग्यावर होत असलेले विपरीत परिणाम सारेच भोगत आहेत. परंतु नैसर्गिक रितीने उगवलेल्या म्हणजेच बिनाखताच्या या रानभाज्या आरोग्यसंवर्धनासह मानसिक स्वास्थ देणाऱ्या ठरु शकतात. जसे की आपणाकडे थोडी जागा असेल तर आपण आपल्या घरी काही हंगामात वेली स्वरूप झाडे लावू शकतो. कोणतेही कष्ट न करता सहज काही भाज्या घरी उपलब्ध होत असल्याने इतर आप्तस्वकीयांना सुध्दा विनामूल्य किंवा मूल्य घेउन त्या देता येतात. एकतर स्नेह वृद्धिंगत करण्याचा प्रयोग व रोजगार निर्मितीचा प्रयोग यातून साध्य होतो. पारंपारिक बीजांचे वाण आपल्या संग्रही राहते. पर्यावरणाचे संरक्षणही याद्वारे होईल. आपल्या आहारात पाने फुले, फळे, कंदमुळे याचा वापर होतच असतो. पण तो कसा करावा हे रानभाज्यांच्या गुण वैशिष्ट्यासह कृती सुध्दा तिने सांगितलेली आहे. तिच्या लेखणीतून रानभाज्यांचा सुगंध महाराष्ट्रभर पसरावा, जीभेच्या इच्छेसह खाणाऱ्यांचे आरोग्य सुदृढ व्हावे. याचा रोजगार करणाऱ्याकडे भरभरून मागणी वाढावी, पर्यावरण संवर्धन व्हावे गडचिरोली जिल्ह्याचे पर्यावरणीय महत्त्व कळावे यासह संगीता ठलाल ला खुप खुप शुभेच्छा

पूर्व विदर्भातील झाडीपट्टीच्या प्रदेशात वनराईने नटलेल्या भू प्रदेशात नानाऱ्हरेच्या विविध रानभाज्या उपलब्ध आहेत. पण, त्यांची फारशी ओळख नवीन पिढीला नाही. आरोग्याच्या दृष्टीने ह्या, रानभाज्यांचे महत्व फार मोलाचे आहे. हा रानमेवा निसर्गाने दिलेली देणगी आहे. या रानभाज्यांचे गुणधर्म सामान्य माणसांपर्यत या,”रानभाज्यांच्या जगात” पुस्तक रूपाने पोहोचविण्याचे काम श्रीमती संगीता ठलाल करत आहेत. याचा मला मनस्वी आनंद होत आहे.

पद्मश्री डॉ. परशुराम खुणे
मु. गुरूनोली ता.कुरखेडा जि.गडचिरोली

महाराष्ट्राच्या पूर्वटोकावरील झाडीप्रदेश, झाडीपट्टी या नावानेही ओळखला जातो. उत्तरेकडे मध्यप्रदेश तर पूर्वेकडे छत्तीसगढ व पश्चिमेकडे उर्वरित महाराष्ट्र अशा एका त्रिकोणात वसलेला झाडीपट्टीचा परिसर भारताचा मुकूट असलेल्या काश्मीरलाही टक्कर देतो कधी-कधी. भरपूर जंगल, प्रत्येक गावात किमान तीन-चार लहानमोठे तलाव तथा कोळशाच्या खाणी व सिमेंटचे कारखाने, औष्णिक वीज प्रकल्प, इ. विविधतेने नटलेल्या या झाडीपट्टीत आता गडचिरोलीतील लोखंडसम खनिजाने नव्यानेच हजेरी लावलेली आहे.  एवढेच नव्हे तर स्व.बाबा आमटे व डाॅ.विकास आमटे यांचे आनंदवन, डाॅ.अभय बंग व डाॅ.राणी बंग यांचे सर्च, डाॅ.प्रकाश आमटे व डाॅ.मंदाकिनी आमटे यांचे हेमलकसा येथील प्रकल्प, विश्वप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व देवाजी तोफा यांनी लेखा-मेंढा या गावात साकार केलेली “आमच्या गावात आम्हीच सरकार” ही अभिनव अशी संविधानसंमत संकल्पना, अशा “एकसे बढकर एक” नाविन्यपूर्ण विविधतेने नटलेला आमचा झाडीपट्टीचा परिसर जणू एक जागतिक चमत्कारच म्हणावा लागेल. याच आमच्या झाडीपट्टीत आढळून येणारी नानाविध प्रकारची वनौषधी व वन-भाजी/रानभाजी हे सुद्धा आमच्या झाडीपट्टीचे एक अनन्यसाधारण असे “महत्त्व” आहे. अशाच वन-भाजी/रानभाजी व तत्सम इतर भाज्या तथा वेली व जडीबुटी/कंदमुळे यांची ओळख करून देणारी आमची झाडीकन्या संगीता ठलाल, हे नाव सुद्धा आता झाडीपट्टीत आपली ओळख घट्ट करीत आहे. अशा आमच्या झाडीकन्येने या परिसरात सहज उपलब्ध असलेल्या वन-भाजी/रानभाजी, तत्सम इतर पौष्टिक भाज्या, वेलीवर्गीय फळे, औषधीय गुणधर्म असलेली जडीबुटी/कंदमुळे यांचे अतिशय सुंदर व सक्षम संकलन केले आहे. वाचकांना या संकलनातून फक्त विविध वन-भाजी/रानभाजी वगैरेचीच ओळख होणार नसून त्यांचे औषधीय गुणधर्म सुद्धा जाणता/समजता येतील. या नाविन्यपूर्ण संकलनासाठी आमची ही झाडीकन्या संगीता ठलाल अभिनंदनास पूर्णतः पात्र आहे.

ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, ता.आमगांव,
जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…

11 hours ago

अयोध्येतील दानपेटी प्रकरण : श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कसोटी Ram Mandir Donation Box Case

स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…

17 hours ago

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

1 day ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

2 days ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

3 days ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

3 days ago