काय चाललयं अवतीभवती

स्त्रीवादाच्या पुढे जाऊन माणूसपणाची वाटचाल

अंजली ढमाळ लिखित ‘निखळत्या चौकटीत’ कादंबरीवर परिसंवादात

सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे परिसंवादाचे आयोजन

पुणे – ‘निखळत्या चौकटीत’ ही कादंबरी स्त्रीवादाच्या पुढे जाऊन माणूसपणाची वाटचाल मांडणारी आहे,’ असे मत सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंजली ढमाळ लिखित आणि रोहन प्रकाशन प्रकाशित ‘निखळत्या चौकटीत’ कादंबरीवरील परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केले.

सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्रातील गुणवान लेखकांना पुढे घेऊन जाण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठानतर्फे पुणे एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात ज्येष्ठ समीक्षक डॉ. रेखा इनामदार साने यांच्या अध्यक्षतेखाली या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. समीक्षक डॉ. दत्ता घोलप स्त्रीवादी कार्यकर्त्या डॉ. गीताली वि. म. प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित असलेल्या या मंचावर लेखिका अंजली ढमाळ समाज साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक अजय कांडर उपस्थित होते.

डॉ. दत्ता घोलप यांनी ही कादंबरी कठोर पुरुषी व्यवस्थेचे मनसुबे उघड करणारी असून, समांतरपणे अनेक स्त्रियांच्या जगण्याचा अवकाश पकडण्यात यशस्वी ठरल्याचे सांगितले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गीताली वि. म. यांनी कादंबरीच्या अनुषंगाने कुटुंब व्यवस्थेतील ताणेबाणे आणि पुरुषांची कुचंबणा यावर सखोल मांडणी केली.

अध्यक्षीय भाषणात डॉ. रेखा इनामदार-साने यांनी लेखिकेच्या भाषेचे आणि आशयाचे कौतुक केले. ‘कादंबरीतील पात्रे काळ्या-पांढऱ्या रंगात रंगवलेली नसून, ती स्खलनशील माणसे आहेत हे दाखवण्यात लेखिका यशस्वी झाली आहे,’ असे त्या म्हणाल्या.

आपली भूमिका मांडताना लेखिका अंजली ढमाळ म्हणाल्या, ‘व्यक्ती आणि समष्टीचा विचार वेगळा करता येत नाही. स्त्री-पुरुषांच्या नातेसंबंधांतील गुंते सुटावेत आणि माणूसपणाच्या मूल्यांकडे जाण्याचे बळ मिळावे, हाच या लेखनाचा उद्देश आहे.’ प्रास्ताविक अजय कांडर यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ.प्रिया निघोजकर यांनी केले. डॉ. योगिता राजकर यांनी आभार मानले. मनीषा शिरटावले यांनी स्वागत केले.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ अनुवादक डॉ. दामोदर खडसे, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अपर जीएसटी कमिशनर वैशाली पतंगे, ज्येष्ठ अभ्यासक मुकुंद कुळे, ज्येष्ठ साहित्यिक अंजली कुलकर्णी, इंदुमती जोंधळे, कवी प्रवीण अक्कनवरु, अभिनेते आशुतोष घोरपडे, कवयित्री योजना यादव, ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे, कवी व लेखक श्रीरंजन आवटे, ज्येष्ठ उद्योजक कल्याण तावरे, डॉ. गिरिजा गोडबोले, मेधा ताडपत्रीकर, साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री संगीता बर्वे, कादंबरीकार बबन मिंडे, सुशील धसकटे, फिल्ममेकर तथा छायाचित्रकार संदेश भंडारे, कथालेखिका सुचिता घोरपडे, संशोधक डॉ. निर्मोही फडके आदी मान्यवर उपस्थित होते.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: Anjali Dhamalauthor interactionbook discussionbook launchbook loversBook reviewbook seminarcontemporary novelcriticismcultural eventdiscourseDr Datta GholapDr Geetali V MDr Rekha Inamdar Sanefamily systemFeminismgender relationsHuman ValuesHumanityIye Marathichiye Nagariliterary discussionliterary forumliterary personalitiesliterature eventliterature loversMaharashtra LiteratureMarathi authorMarathi BooksMarathi criticismMarathi CultureMarathi LiteratureMarathi NovelMarathi societyNikhalatya ChoukatitnovelistPune NewsPune SeminarreadersRelationshipsRohan Prakashanseminar newsSindhudurg Samaj Sahitya Pratishthansocial issuessocial thoughtsocial valuessocietyWomen EmpowermentWomen Studieswritersअजय कांडरअंजली ढमाळआधुनिक कादंबरीइये मराठीचिये नगरीकवयित्रीकुटुंब व्यवस्थाडॉ गीताली वि मडॉ दत्ता घोलपडॉ रेखा इनामदार सानेनातेसंबंधनिखळत्या चौकटीतपुणे परिसंवादपुणे बातम्यापुस्तक परिसंवादपुस्तक परीक्षणपुस्तकप्रेमीप्रिया निघोजकरमनीषा शिरटावलेमराठी कादंबरीमराठी संस्कृतीमराठी साहित्यमहाराष्ट्र साहित्यमहिला प्रश्नमाणूसपणमानवी मूल्येयोगिता राजकररोहन प्रकाशनलेखकलेखक संवादलेखिकावाचकवाचन संस्कृतीव्यक्तीसमकालीन साहित्यसमष्टीसमीक्षणसंशोधकसामाजिक प्रश्नसामाजिक विचारसांस्कृतिक कार्यक्रमसाहित्य अकादमीसाहित्य अभ्यासकसाहित्य चर्चासाहित्य रसिकसाहित्यिकसाहित्यिक कार्यक्रमसाहित्यिक व्यासपीठसिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानस्त्री-पुरुष नातेस्त्रीवाद

Recent Posts

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

3 hours ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

4 hours ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

13 hours ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

13 hours ago

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…

1 day ago

कोल्हापूरच्या युवा दिग्दर्शकाच्या ‘अनघा’ला जम्मू फिल्म फेस्टिव्हलची पसंती

https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…

2 days ago