शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भूमीनिष्ठांचे प्रश्न मांडणारा कथासंग्रह – रानरांगूळ

डॉ. विठ्ठल जाधव यांचा ‘रानरांगूळ’ कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. मातीचे दुःख आणि वेदना साहित्याच्या माध्यमातून ते मांडतात. शेती, शेतकरी यांची स्थिती फारशी सुधारली नाही. ही खंत व्यक्त करून ‘रानरांगूळ’ कथेमधून शेतीचे प्रश्न उपस्थित केले आहेत.

प्रा. डॉ. भाऊसाहेब नटके
संतपीठ, पैठण

बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. त्यातून मार्ग काढणारा तरुण फसतो. हे वर्णन ‘काळीपिवळी’ कथेतू येते. वाहन घेणे‚ कर्जबाजारी होणे‚ ते चालवणे. तर सरकारी नोकरी नाही. हाताला काम नाही. मुलींची संख्या कमी झालेली आहे. शेकडो लग्नाळू मुले गावात दिसतात. लेखकाच्या मनातील प्रश्न कथेतून येतो. तरूण दुकान सुरू करतो. लग्न झाले की दुकान मोडतो. दुकानाचे भाडे देणे परवडत नाही. वास्तव मांडणारी कथा नवीन प्रश्नांची उकल करते. बबन तात्याचं गावातलं दुकान आणि मुलगा यांचे प्रसंग. दुसराच कर्तृत्ववान संजू प्रगती करतो. ज्यांना अनुकूल वातावरण मिळते. त्याची प्रगती होत नाही. जो प्रतिकूल परिस्थितीत मार्ग काढतो. तो जीवनात यशस्वी होतो. हे सांगणारी ‘पत्तरवाळी’ ही कथा.

भारतात महाराष्ट्र हा आघाडीवर असणारा प्रदेश. शेतकरी आत्महत्या घडत असताना ऊसाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. कारखान्याला ऊस न्यायचा असेल तर कारखान्याची जवळीक लागते. मजुरीचे वाढलेले दर, वाहतूक यात हतबल झालेला ऊस बागायतदार, चिरडला जातो. एकतर खते, बी-बियाणे, मशागत आणि तोडीचा खर्चाचा मेळ जुळत नाही. जास्त काळाच्या ऊसास पांढरे तुर्रे फुटतात. कारखाना ऊस नेत नाही. डॉ. विठ्ठल जाधव यांच्या ‘जळीत’ या कथेतील नायक हा जळालेल्या ऊसाच्या पाचटामध्ये स्वतःला जाळून घेतो. ही सत्यघटना कथेतून मांडली आहे. सर्वच कथांतून हृदयस्पर्शी निवेदन, पात्र, प्रसंग आणि घटना यांचा मेळ साधला आहे.

गरीब आणि श्रीमंत मुलांमधील द्वंद्व ‘चिमुकाटा’ या कथेमध्ये येते. गुरूजींची ‘हंटरकाठी’ तर म्हैस विकणे आहे! ही विनोदी ढंगातील कथा. लळा, सीएचबी, डीम-फूल, तंदूररोटी, गाव अक्की, कोरोनातील भ्यापान या कथा भूमीनिष्ठेचे मार्दव मांडतात.

पुस्तकाचे नाव – रानरांगूळ (कथासंग्रह)
लेखक – डॉ. विठ्ठल जाधव
प्रकाशक – स्टोरीमिरर, मुंबई
पृष्ठ; १३० मूल्य; २१० रु.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: agrarian issuesagriculture crisiscontemporary Marathi storiesDr. Vitthal Jadhavemotional short storiesfarmer problemsfarmer sorrowfarmer storiesfarming in IndiaIndian agricultureIndian rural lifeIye Marathichiye NagariMarathi authorMarathi book reviewMarathi fictionMarathi LiteratureMarathi short storiespain of farmersRanarangulrealistic fictionrural India literaturerural Maharashtrarural storytellingsocial issues in literaturestories of soilvillage life storiesइये मराठीचिये नगरीकृषी समस्याखेड्याचे जीवनग्रामीण कथाग्रामीण भारतग्रामीण वेदनाडॉ. विठ्ठल जाधवमराठी कथासंग्रहमराठी ग्रामीण कथामराठी पुस्तक परिचयमराठी भावकथामराठी लेखकमराठी साहित्यमहाराष्ट्रातील कथामातीचे दुःखरानरांगूळवास्तववादी कथाशेतकरी आत्महत्यांचा प्रश्नशेतकरी कथाशेतकरी साहित्यशेतकऱ्यांची व्यथाशेतकऱ्यांचे दुःखशेती संकटशेती समस्यासामाजिक साहित्यसाहित्यिक प्रयोग

Recent Posts

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…

11 hours ago

अयोध्येतील दानपेटी प्रकरण : श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कसोटी Ram Mandir Donation Box Case

स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…

17 hours ago

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

1 day ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

2 days ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

3 days ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

3 days ago