विश्वाचे आर्त

श्रद्धा असावी, पण ती डोळस हवी

अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासि नाही म्हणितले ।
ऐसेनिहि विष होय सुदले । नवज्वरी देता ।। १८४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा

ओवीचा अर्थ – अरे, दुध जरी गायीचे असलें, तरी तें पथ्यास घेऊ नये, असे वैद्य शास्त्राने सांगितले असतानाही आग्रहाने नवज्वरास दिले तर ते विषवत (मारक) होते.

भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही कार्य करू नये. हे सांगणारी ही ओवी आहे. शास्त्राचा अभ्यास का करायला हवा ? शास्त्राचे पालन का करायला हवे ? जीवनशैलीत विज्ञानाला का महत्त्व द्यायला हवे ? हे सर्व या ओवीतून समजून घ्यायला हवे. श्रद्धा अन् अंधश्रद्धा यात बऱ्याचदा शास्त्र बाजूला राहाते अन् यातून उचित फळ भेटत नाही. निराशाच पदरी पडते. श्रद्धा जरूर असावी, पण ती अंधश्रद्धा नसावी. श्रद्धा डोळस असावी. म्हणजे चुका होण्याची शक्यता कमी असते.

भारतीय संस्कृतीत गायीला देवता म्हटले आहे. याची कारणेही अनेक आहेत. देशी गायीच्या दुधात अन् गोमुत्रात अनेक औषधी गुणधर्म आहेत. अनेक असाध्य रोग बरे करण्याचे सामर्थ्य त्यात आहे. पर्यावरण शुद्ध करण्याचे गुणधर्मही देशी गायीच्या गोमुत्रात आहेत. यासाठीच ते घरात, परिसरात शिंपडले जाते. देवत्व प्रदान करताना यामागचे शास्त्र समजून घेणे गरजेचे आहे. कारण देवत्व सांगताना शास्त्राचा आधार असायला हवा. शास्त्राचे आचरण असायला हवे. तरच ते फलदायी ठरते. यासाठीच श्रद्धा ही डोळस असायला हवी.

आजारी माणसाला वैद्य काही पथ्ये सांगतात. ही पथ्ये पाळली जात नसल्याने आजार बळावतो. बऱ्याचदा श्रद्धा अन् भावनेच्या पोटी ही पथ्ये पाळली जात नाहीत. साखरेचा त्रास असणाऱ्या व्यक्तीला गोड प्रसाद खाण्याचा आग्रह केला जातो. देवाचा नैवद्य टाकून कसा चालेल म्हणून तोही श्रद्धे पोटी खातो अन् आजार बरा होण्याऐवजी बळावतो. अशा घटना बऱ्याचदा घडतात. अशा अंध भक्तांचे डोळे उघडण्याचे काम ज्ञानेश्वर माऊलीने या ओवीतून केले आहे.

गायीच्या दुधाचे सेवन वैद्यांनी वर्ज म्हणून सांगितले असेल तर त्याचे पालन रोग्याने करायलाच हवे. शास्त्राचे पालन केले तरच औषधाचे चांगले परिणाम दिसतील. अन्यथा औषधींचाही उपयोग होऊ शकत नाही. नको असलेल्या गोष्टीचे सेवन केले तर ते विषच ठरणार नाही का ? हे लक्षात घेऊन आचरण करायला हवे. गाय ही देवता जरूर आहे. यावर श्रद्धा जरूर असायला हवी. पण ती अंधश्रद्धा नको. विज्ञानाच्या आधारवर जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. विज्ञानाचे, शास्त्राचे नियम हे यासाठीच पाळायला हवेत.

विज्ञानाने हा देह समजून घ्यायला हवा. पंचमहाभूतांचा हा देह समजून घेऊन जीवनशैली तयार करायला हवी. या देहात आलेल्या आत्म्याची ओळखही विज्ञानाने करून घ्यायला हवी. हे ज्ञान जेंव्हा होईल तेंव्हाच आपणास आत्मज्ञानी होता येईल. अन् आत्मज्ञानी राहाता येईल.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

सहाय्यक प्राध्यापक भरती पारदर्शक की पुन्हा ‘व्यक्तीनिष्ठ’? ५,००० हून अधिक पदांच्या प्रक्रियेवर संभ्रम का?

महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रातील हजारो इच्छुक उमेदवारांसाठी सहाय्यक प्राध्यापक भरतीची प्रक्रिया ही आशेचा किरण ठरली…

2 hours ago

स्वतःच्या डोळ्यांनी ‘अजत्व’ कसे पाहता येते? ज्ञानेश्वरीतील गूढ संदेश काय?

ज्ञानेश्वरीतील ही ओवी साधकाला बाह्य जगाच्या धावपळीपासून अंतर्मुख शांततेकडे घेऊन जाते. ‘तैसे राहोनि ठायठिके’ म्हणताना…

5 hours ago

पुण्याच्या भूमीतून डिजिटल विश्वाला नवी दिशा ! BRICS ICT Track 2026 In Pune

पुण्याचे डिजिटल शिखर १७ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पुण्यात पार पडलेली 'ब्रिक्स आयसीटी…

13 hours ago

विचारांची मशाल घेऊन अंधाराशी लढलेला लोकशिक्षक : डॉ. नरेंद्र दाभोळकर

चमत्कारांच्या नावाखाली होणारी फसवणूक, अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला समाज, जात-धर्माच्या भिंती आणि प्रश्न विचारण्यालाच लागलेली भीती—या…

1 day ago

श्रीगुरूंचा महिमा जाणण्याचे साधन कोणते ? Guru Mahima: The Power of Surrender in Dnyaneshwari

गुरूंचा महिमा शब्दांत कितीही सांगितला, तरी तो पूर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही. कारण गुरू हे…

2 days ago