विश्वाचे आर्त

श्रद्धा असावी, पण ती डोळस हवी

अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासि नाही म्हणितले ।
ऐसेनिहि विष होय सुदले । नवज्वरी देता ।। १८४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा

ओवीचा अर्थ – अरे, दुध जरी गायीचे असलें, तरी तें पथ्यास घेऊ नये, असे वैद्य शास्त्राने सांगितले असतानाही आग्रहाने नवज्वरास दिले तर ते विषवत (मारक) होते.

भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही कार्य करू नये. हे सांगणारी ही ओवी आहे. शास्त्राचा अभ्यास का करायला हवा ? शास्त्राचे पालन का करायला हवे ? जीवनशैलीत विज्ञानाला का महत्त्व द्यायला हवे ? हे सर्व या ओवीतून समजून घ्यायला हवे. श्रद्धा अन् अंधश्रद्धा यात बऱ्याचदा शास्त्र बाजूला राहाते अन् यातून उचित फळ भेटत नाही. निराशाच पदरी पडते. श्रद्धा जरूर असावी, पण ती अंधश्रद्धा नसावी. श्रद्धा डोळस असावी. म्हणजे चुका होण्याची शक्यता कमी असते.

भारतीय संस्कृतीत गायीला देवता म्हटले आहे. याची कारणेही अनेक आहेत. देशी गायीच्या दुधात अन् गोमुत्रात अनेक औषधी गुणधर्म आहेत. अनेक असाध्य रोग बरे करण्याचे सामर्थ्य त्यात आहे. पर्यावरण शुद्ध करण्याचे गुणधर्मही देशी गायीच्या गोमुत्रात आहेत. यासाठीच ते घरात, परिसरात शिंपडले जाते. देवत्व प्रदान करताना यामागचे शास्त्र समजून घेणे गरजेचे आहे. कारण देवत्व सांगताना शास्त्राचा आधार असायला हवा. शास्त्राचे आचरण असायला हवे. तरच ते फलदायी ठरते. यासाठीच श्रद्धा ही डोळस असायला हवी.

आजारी माणसाला वैद्य काही पथ्ये सांगतात. ही पथ्ये पाळली जात नसल्याने आजार बळावतो. बऱ्याचदा श्रद्धा अन् भावनेच्या पोटी ही पथ्ये पाळली जात नाहीत. साखरेचा त्रास असणाऱ्या व्यक्तीला गोड प्रसाद खाण्याचा आग्रह केला जातो. देवाचा नैवद्य टाकून कसा चालेल म्हणून तोही श्रद्धे पोटी खातो अन् आजार बरा होण्याऐवजी बळावतो. अशा घटना बऱ्याचदा घडतात. अशा अंध भक्तांचे डोळे उघडण्याचे काम ज्ञानेश्वर माऊलीने या ओवीतून केले आहे.

गायीच्या दुधाचे सेवन वैद्यांनी वर्ज म्हणून सांगितले असेल तर त्याचे पालन रोग्याने करायलाच हवे. शास्त्राचे पालन केले तरच औषधाचे चांगले परिणाम दिसतील. अन्यथा औषधींचाही उपयोग होऊ शकत नाही. नको असलेल्या गोष्टीचे सेवन केले तर ते विषच ठरणार नाही का ? हे लक्षात घेऊन आचरण करायला हवे. गाय ही देवता जरूर आहे. यावर श्रद्धा जरूर असायला हवी. पण ती अंधश्रद्धा नको. विज्ञानाच्या आधारवर जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. विज्ञानाचे, शास्त्राचे नियम हे यासाठीच पाळायला हवेत.

विज्ञानाने हा देह समजून घ्यायला हवा. पंचमहाभूतांचा हा देह समजून घेऊन जीवनशैली तयार करायला हवी. या देहात आलेल्या आत्म्याची ओळखही विज्ञानाने करून घ्यायला हवी. हे ज्ञान जेंव्हा होईल तेंव्हाच आपणास आत्मज्ञानी होता येईल. अन् आत्मज्ञानी राहाता येईल.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

‘मुक्त’ विद्यापीठाची वाटचाल खासगीकरणाकडे ? Open University moving towards privatization

गरीब, ग्रामीण आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी स्थापन झालेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आता खाजगी संस्थांच्या…

13 hours ago

भारतीयत्व म्हणजे नेमके काय ? उत्तर सापडते भारतीय संविधानात ! Indianness ? The answer found in the Constitution !

भारतीयत्वाची माझी संकल्पना… आपण भारतीय आहोत म्हणजे काय आहोत ? आपला जन्म भारतामध्ये झाला आहे,…

15 hours ago

विशेष आर्थिक लेखः राज्यांच्या वित्तीय कसरतीचे वास्तव गंभीरच Financial Reality of the states

देशातील बहुतेक सर्व राज्य सरकारांची आर्थिक स्थिती बऱ्याच प्रमाणात चिंताजनक आहे. प्रत्येक राज्याची स्थिती पाहिल्यास…

1 day ago

हुकूमाचा एक्का नि भाऊचा धक्का…ऑपरेशन टायगरने उबाठाची झोप उडवली Ekanath Shinde Operation Tiger

सहा खासदारांच्या पक्षांतराचा धक्का अजूनही सावरता न आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता विधान परिषदेचे…

2 days ago

प्रेमाने केलेले प्रत्येक कर्तव्य हीच खरी पूजा True Worship

मनुष्याला मोक्ष मिळण्यासाठी जन्म, जात, कुल, विद्वत्ता किंवा बाह्य कर्मकांड यांपेक्षा अंतःकरणातील निखळ प्रेम अधिक…

2 days ago

तुळजापूर येथील जागर साहित्य पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन Call for Jagar Literary Award In Tuljapur

तुळजापूर : मराठवाडा साहित्य परिषद, शाखा तुळजापूर यांच्या वतीने 'जागर साहित्य पुरस्कार' जाहीर करण्यात आला…

3 days ago