October 25, 2025
अक्षरसागर साहित्य मंच, गारगोटी तर्फे २०२५ सालच्या अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके मागविण्यात आली आहेत. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान प्रकाशित पुस्तके २५ डिसेंबरपर्यंत पाठवावीत.
Home » अक्षरसागर पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

अक्षरसागर पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

गारगोटी – येथील अक्षरसागर साहित्य मंच यांचे वतीने अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके मागविणेत येत आहेत. कादंबरी, कथा कविता, बालसाहित्य (गद्य, पद्य दोन्ही) आणि संकिर्ण (इतर सर्व साहित्य प्रकार) या साहित्य प्रकारांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे‌ पुरस्काराचे स्वरुप असेल.

तरी लेखक, प्रकाशक यांनी 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती व लेखकाचा अल्पपरिचय दि. 25 डिसेंबर 2025 पर्यंत पोहोचतील अशा रितीने पाठवावीत.

पुस्तके पाठवणेचा पत्ता –
डॉ. मा. ग. गुरव, अध्यक्ष, अक्षरसागर साहित्य मंच,
अनुसया निवास, वाघापूर , ता. भुदरगड, जि. कोल्हापूर – 416209 (संपर्क – 9421114264)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading