March 20, 2026

इये मराठीचिये नगरी

साहित्य, संस्कृती, समाज, राजकारण आणि प्रेरणादायी लेखांसाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Like करा

मराठी विचारांची डिजिटल नगरी

भारतातील ३१.४५ लाख हातमाग कुटिरोद्योग एककांची स्थिती, आणि एनएचडीपी व आरएमएसएस योजनांद्वारे मिळणाऱ्या सरकारी सहाय्याची माहिती.
Home » हातमाग कुटिरोद्योगाची स्थिती
शेती पर्यावरण ग्रामीण विकास स्पर्धा परीक्षा, शिक्षण

हातमाग कुटिरोद्योगाची स्थिती

2019-20 मधील चौथ्या अखिल भारतीय हातमाग जनगणनेनुसार, देशभरातील 31.45 लाख कुटुंबांमध्ये 35.22 लाख हातमाग विणकर आणि संबंधित कामगार आहेत. त्यानुसार, देशात 31.45 लाख हातमाग कुटिरोद्योग एकक कार्यरत असल्याचे मानले जाते, अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी राज्यसभेत दिली.

हातमाग क्षेत्र असंघटित आहे, यात सरकार विणकर/कामगारांना थेट रोजगार देत नाही. हातमाग विणकर/कामगार पारंपरिक कुशल उपक्रमांमध्ये सहभागी होतात, त्यामुळे त्यांना स्वयंरोजगार मिळतो. तथापि, वस्त्रोद्योग मंत्रालय देशभरातील हातमागांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हातमाग विणकरांच्या कल्याणासाठी (i) राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम (एन एच डी पी) आणि (ii) कच्चा माल पुरवठा योजना (आर एम एस एस) राबवत आहे.

या योजनांअंतर्गत, पात्र हातमाग एजन्सी/विणकरांना कच्चा माल, उन्नतीकरण केलेले यंत्रमाग आणि संलग्न उत्पादनांची खरेदी, सौर प्रकाश एकक, कार्य ठिकाणासाठी बांधकाम, कौशल्य, उत्पादन आणि आरेखन विकास, तांत्रिक आणि सामान्य पायाभूत सुविधा, विपणन, विणकरांच्या मुद्रा योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात कर्ज, सामाजिक सुरक्षा, गरीब परिस्थिती असणाऱ्या पुरस्कार विजेत्या विणकरांना मदत इत्यादींसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.

एनएचडीपी आणि आरएमएसएस योजनांतर्गत गेल्या पाच वर्षांत म्हणजेच 2020-21 ते 202-25 या काळात 1,516 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून 1480.71 कोटी रुपये वितरित करण्यात आले.

योजना जारी राखण्यासाठी /नवीन योजना तयार करण्यापूर्वी, विद्यमान योजनांच्या परिणामांचा अभ्यास केला जातो. 2021-22 ते 2025-26 दरम्यान अस्तित्वात असलेल्या मागील योजनांचे तृतीय पक्ष परिणामांचे मूल्यांकन केल्यानंतर एनएचडीपी आणि आरएमएसएस या योजना अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आल्या.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

सीमावाद, उद्योगांचा पळ आणि बंद योजना… सरकारकडे उत्तर आहे का ?

कोल्हापूरी चप्पल तयार करणाऱ्या कारागिरांचे पुनरुज्जीवन

धारावीची नरकातून सुटका होणार…

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!