📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 18, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

हातमाग कुटिरोद्योगाची स्थिती

भारतातील ३१.४५ लाख हातमाग कुटिरोद्योग एककांची स्थिती, आणि एनएचडीपी व आरएमएसएस योजनांद्वारे मिळणाऱ्या सरकारी सहाय्याची माहिती.

2019-20 मधील चौथ्या अखिल भारतीय हातमाग जनगणनेनुसार, देशभरातील 31.45 लाख कुटुंबांमध्ये 35.22 लाख हातमाग विणकर आणि संबंधित कामगार आहेत. त्यानुसार, देशात 31.45 लाख हातमाग कुटिरोद्योग एकक कार्यरत असल्याचे मानले जाते, अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी राज्यसभेत दिली.

हातमाग क्षेत्र असंघटित आहे, यात सरकार विणकर/कामगारांना थेट रोजगार देत नाही. हातमाग विणकर/कामगार पारंपरिक कुशल उपक्रमांमध्ये सहभागी होतात, त्यामुळे त्यांना स्वयंरोजगार मिळतो. तथापि, वस्त्रोद्योग मंत्रालय देशभरातील हातमागांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हातमाग विणकरांच्या कल्याणासाठी (i) राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम (एन एच डी पी) आणि (ii) कच्चा माल पुरवठा योजना (आर एम एस एस) राबवत आहे.

या योजनांअंतर्गत, पात्र हातमाग एजन्सी/विणकरांना कच्चा माल, उन्नतीकरण केलेले यंत्रमाग आणि संलग्न उत्पादनांची खरेदी, सौर प्रकाश एकक, कार्य ठिकाणासाठी बांधकाम, कौशल्य, उत्पादन आणि आरेखन विकास, तांत्रिक आणि सामान्य पायाभूत सुविधा, विपणन, विणकरांच्या मुद्रा योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात कर्ज, सामाजिक सुरक्षा, गरीब परिस्थिती असणाऱ्या पुरस्कार विजेत्या विणकरांना मदत इत्यादींसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.

एनएचडीपी आणि आरएमएसएस योजनांतर्गत गेल्या पाच वर्षांत म्हणजेच 2020-21 ते 202-25 या काळात 1,516 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून 1480.71 कोटी रुपये वितरित करण्यात आले.

योजना जारी राखण्यासाठी /नवीन योजना तयार करण्यापूर्वी, विद्यमान योजनांच्या परिणामांचा अभ्यास केला जातो. 2021-22 ते 2025-26 दरम्यान अस्तित्वात असलेल्या मागील योजनांचे तृतीय पक्ष परिणामांचे मूल्यांकन केल्यानंतर एनएचडीपी आणि आरएमएसएस या योजना अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आल्या.

Related posts

शेतकऱ्यांना वैज्ञानिक लाभ मिळवून देण्यासाठी दर महिन्याला ‘किसानोंकी बात’ कार्यक्रम

बीज संवर्धन, संरक्षणाचे महत्त्व

ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता !

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406