Latika Chaudharys poem Bapache Abhang included in the curriculum of North Maharashtra University
जळगाव – दोंडाईचा येथील साहित्यिका लतिका चौधरी यांची ‘बापाचे अभंग’ ही मराठी कविता जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एफ. वाय. बी. ए. या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे.
लतिका चौधरी या मराठी व अहिराणी भाषेतील कविता, कथा, कादंबरी, ललित, बालकाव्य अशा सर्वच प्रकारात दर्जेदार लेखन करणाऱ्या व स्त्रीवादी जाणिवेच्या काव्यलेखन करणाऱ्या लक्षवेधी कवयित्री आहेत. ’नियं आभाय’ , ‘नियतीना सूड'(अहिराणी काव्यसंग्रह), ‘खान्देशी बावनकशी’, ‘गल्लीनी भाऊबंदकी'(अहिराणी ललित गद्य), ‘भावसरोवर’, ‘माती’ (मराठी काव्यसंग्रह) अशी एकूण दहा पुस्तके प्रकाशित असून त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
अनेक वाङ्मयीन नियतकालिकात त्यांचे काव्यलेखनही 20 वर्षांपासून सुरू आहे. मराठी कवितेला दिले जाणारे मानाचे वाङ्मयीन 16 पुरस्कारही त्यांना प्राप्त आहेत.
अभ्यासक्रमात समाविष्ट केलेली कविता
बापाचे अभंग
बाप जीवनात
चारधाम तीर्थ
वाटतो कृतार्थ
सहवास ।।1।।
देत राही झुंज
निसर्ग शत्रूशी
शिवार मित्राशी
पोटासाठी ।।2।।
उसणं धाडस
हासू मुखावर
धाव सुखावर
घरासाठी ।।3।।
खचले पिचले
मन नांगरतो
नभ पांघरतो
विश्वासाचे ।।4।।
हिरवं शिवार
पीक डोलणारं
दार खोलणारं
आनंदाचं ।।5।।
उन्हा पावसात
कधी विर्घळावं
कधी पाझरावं
रानासाठी ।।6।।
पोरा-घरामागे
ठाकला अभंग
बाप पांडुरंग
लेकरांचा ।।7।।
लतिका चौधरी
दोंडाईचा , जि. धुळे
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव परिक्षेत्रातील प्रथम वर्ष बी ए च्या अभ्यासक्रमात माझ्या कवितेचा समावेश होणे ही माझ्यासाठी आनंदाची व ऊर्जा देणारी बाब आहे. अभ्यासक्रम मंडळाने माझ्या लेखनाला न्याय दिला ह्याचा मनस्वी आनंद आहे.
लतिका चौधरी
परमेश्वर सर्वशक्तिमान असला, तरी त्यालाही ज्या एका शक्तीपुढे नतमस्तक व्हावे लागते, ती म्हणजे भक्ती. भक्ताचे…
राष्ट्रे केवळ आपल्या विजयाच्याच नव्हे, तर पराभवाच्या स्मृतीही कशा जपतात, याचे जगातील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे…
महाराष्ट्रात ५०१२ सहायक प्राध्यापकांच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी नव्या कार्यपद्धतीतील गुणांकन,पीएच.डी.ला दिलेले…
– पत्रकारितेतील वेग, अचूकता आणि कार्यक्षमतेचा नवा अध्याय पत्रकारितेच्या बदलत्या युगात आता केवळ माहिती निर्माण…
ज्ञानेश्वर माऊलींनी एका अत्यंत साध्या ओवीतून मानवी जीवनाचे गूढ तत्त्व उलगडले आहे.निंबाच्या झाडावरील विपुल निंबोळ्या…
स्टेटलाइन – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न गाजतो आहे—मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार का? केंद्रीय…