📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 7, 2026
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

लतिका चौधरी यांची ‌‘बापाचे अभंग’ ही कविता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

Latika Chaudharys poem Bapache Abhang included in the curriculum of North Maharashtra University

जळगाव – दोंडाईचा येथील साहित्यिका लतिका चौधरी यांची ‌‘बापाचे अभंग’ ही मराठी कविता जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एफ. वाय. बी. ए. या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे.

लतिका चौधरी या मराठी व अहिराणी भाषेतील कविता, कथा, कादंबरी, ललित, बालकाव्य अशा सर्वच प्रकारात दर्जेदार लेखन करणाऱ्या व स्त्रीवादी जाणिवेच्या काव्यलेखन करणाऱ्या लक्षवेधी कवयित्री आहेत. ‌’नियं आभाय’ , ‘नियतीना सूड'(अहिराणी काव्यसंग्रह), ‘खान्देशी बावनकशी’, ‘गल्लीनी भाऊबंदकी'(अहिराणी ललित गद्य), ‘भावसरोवर’, ‘माती’ (मराठी काव्यसंग्रह) अशी एकूण दहा पुस्तके प्रकाशित असून त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

अनेक वाङ्मयीन नियतकालिकात त्यांचे काव्यलेखनही 20 वर्षांपासून सुरू आहे. मराठी कवितेला दिले जाणारे मानाचे वाङ्मयीन 16 पुरस्कारही त्यांना प्राप्त आहेत.

अभ्यासक्रमात समाविष्ट केलेली कविता

बापाचे अभंग

बाप जीवनात
चारधाम तीर्थ
वाटतो कृतार्थ
सहवास ।।1।।

देत राही झुंज
निसर्ग शत्रूशी
शिवार मित्राशी
पोटासाठी ।।2।।

उसणं धाडस
हासू मुखावर
धाव सुखावर
घरासाठी ।।3।।

खचले पिचले
मन नांगरतो
नभ पांघरतो
विश्वासाचे ।।4।।

हिरवं शिवार
पीक डोलणारं
दार खोलणारं
आनंदाचं ।।5।।

उन्हा पावसात
कधी विर्घळावं
कधी पाझरावं
रानासाठी ।।6।।

पोरा-घरामागे
ठाकला अभंग
बाप पांडुरंग
लेकरांचा ।।7।।

लतिका चौधरी
दोंडाईचा , जि. धुळे

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव परिक्षेत्रातील प्रथम वर्ष बी ए च्या अभ्यासक्रमात माझ्या कवितेचा समावेश होणे ही माझ्यासाठी आनंदाची व ऊर्जा देणारी बाब आहे. अभ्यासक्रम मंडळाने माझ्या लेखनाला न्याय दिला ह्याचा मनस्वी आनंद आहे.

लतिका चौधरी

Related posts

मुलांच्या अभ्यासाची चिंता सतावतेय का ?

देशात 30 कौशल्य भारत आंतरराष्ट्रीय केंद्रे लवकरच – पंतप्रधान नरेंद्र मोदी

आद्य मुंबई अन् नाना शंकरशेट 

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406