विश्वाचे आर्त

होय, निसर्गच आपला खरा गुरु, यासाठी करा त्याची सेवा

मान्सूनचा पाऊस कधी गर्जना करत येत नाही. त्याचा प्रवेश हळूवार अन् शांततेत असतो. त्याच्या प्रवेशाने वातावरणात शीतलता येते. तो धावत असतो पण त्याच्या धावण्याचा त्रास वाटत नाही. धावता धावता वातावरणही तो प्रसन्न करत असतो. व्यायाम करताना आपले धावणेही असेच असावे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

आणि आदरे करी बहुवसें । परी कर्ता मी हें नुमसे ।
वर्षाकाळींचें जैसें । मेघवृंद ।। ६३४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – आणि नित्यादिक कर्मे फार आदरानें करतो परंतु ज्याप्रमाणें वर्षाऋतूतील ढग गडबड अथवा गर्जना करीत नाहीत. त्याप्रमाणे नित्यादिक कर्मे केली असें कर्माचा अभिमान घेऊन बोलत नाही.

निसर्ग आपणास कसे वागायचे हे शिकवतो. पण आपण निसर्गाचे हे नियमच पाळत नाही. निसर्गाच्या प्रत्येक कृतीत कसे आचरण असायला हवे हे सांगितलेले जाते. पण आपण ही कृतीच विचारात घेत नाही. यासाठी सर्व प्रथम निसर्गाच्या नियमांचा आपण अभ्यास करायला हवा. त्यानुसार आपण आपली कृती करायला हवी. निसर्गातील अनेक गोष्टीच असे चमत्कार दडलेले आहेत. अनेक रोगांवरील औषधे शोधताना पूर्वीच्याकाळी वैद्य त्या अवयवांचा आकार कसा आहे हे पाहून वनस्पतीची फुले शोधत. ही फुलेच त्या रोगावरील औषधे असत. निसर्गाचे हे अद्भुत रहस्य अभ्यासायला हवे. कारण निसर्गच आपणास सुख अन् समाधान देतो. यासाठी निसर्गाचे संरक्षण, या निसर्गातील जैवविविधतेचे संवर्धन हे करायलाच हवे. असे केल्यास आपले जीवनही आनंदाने भरून जाईल.

निसर्गाचे संवर्धन करण्यात आपण कमी पडत आहोत. आपल्या हव्यासा पोटी आपण निसर्गाचे मोठे नुकसान करत आहोत. अशाने आपणच आपला घात करत आहोत हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. पर्यावरणाचा विचार न करता आपण विकासाच्या गप्पा मारत आहोत. अशाने विकास नव्हे तर विध्वंसच अधिक करत आहोत. हवा, पाणी, वायू, गगन याचे प्रदुषणच होत आहे. पंचमहाभूतांचे प्रदुषण होत आहे. म्हणजेच पंचमहाभूतापासून तयार झालेला देह सुद्धा प्रदुषित होत आहे. आरोग्याच्या मोठ्या समस्या उत्पन्न होत आहेत. अनेक असाध्य रोग या प्रदुषणामुळे होऊ लागले आहेत.

पावसाचे पाणी शुद्ध असते. ते जमिनीत मुरते अन् तेच आपणाला वर्षभर पुरते. पण सध्या जमिनीचे प्रदुषण झाले आहे. विविध रसायनांच्या वापराने जमिनच प्रदुषित झाली आहे. अशाने विहीरी, जलसाठेही प्रदुषित होत आहेत. या दुषित पाण्यामुळेच आरोग्याच्या मोठ्या समस्या उभ्या राहात आहेत. भावीकाळात पाण्याची शुद्धता आपण ठेऊ शकलो नाही, तर आपण जगुही शकणार नाही. यासाठी प्रथम जलप्रदुषण रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे. जलसाठे प्रदुषित होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. यावर उपाययोजना करायला हवी. निसर्ग आपणास शुद्ध राहायला शिकवतो. पाणी शुद्ध ठेवाल तर आरोग्यही सुदृढ, निरोगी राहील. मनात शुद्ध विचार ठेवाल, तर तेच विचार आचरणात येतील. शुद्ध मनाची कृतीही शुद्धच असेल. यासाठी मनाला चांगल्या विचारांची सवय लावायला हवी. मनाची शुद्धता हीच सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे.

मान्सूनचा पाऊस कधी गर्जना करत येत नाही. त्याचा प्रवेश हळूवार अन् शांततेत असतो. त्याच्या प्रवेशाने वातावरणात शीतलता येते. तो धावत असतो, पण त्याच्या धावण्याचा त्रास वाटत नाही. धावता धावता वातावरणही तो प्रसन्न करत असतो. व्यायाम करताना आपले धावणेही असेच असावे. यातून मनाची प्रसन्नता वाढते. धावताना त्रास होता कामा नये. दम भरता कामा नये. थकवा जाणवता कामा नये. असा धावण्याचा वेग हवा. वळवाचा पाऊस असा नसतो. तो इतक्या वेगात येतो अन् होत्याचे नव्हते करून सोडतो. इतक्या जोरात बरसतो की सगळीकडे पाणीच पाणी अन् नुकसानच नुकसान करून टाकतो. असे धावणे आपले नसावे. ते आरोग्यासही उपायकारक असते.

अशा अनेक कृतीतून निसर्ग आपणास कसे वागायचे हे शिकवतो. जीवनातील कामे ही शांत चित्ताने करावीत. घाई गडबड न करता योग्य विचाराने करावीत. त्याचा वेग हा मर्यादीत असावा. कर्माचा गाजावाजा करून. गर्जना करून कामे केल्यास काम कमी नुकसानच अधिक होते. बघ मी किती झपाट्यात काम करतो, हा गर्वच आपणाला संपवतो. निसर्गातील पावसाचा हा नियम लक्षात घेऊन यातून शिकायला हवे. गाजावाजा करून बरसण्यापेक्षा शांत अन् संततधारेप्रमाणे कामे करत राहील्यास लाभ अधिक होईल. निसर्गाचे हे नियम लक्षात घेऊन निसर्गाचे संवर्धन हे करायला हवे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

ओअँसिसचा हिरवा श्वास अन् सहाराच्या वादळाचा काळा कहर The green breath of the oasis

सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने…

14 hours ago

क्षणाचाही विलंब नको : ज्ञानेश्वरीतील संन्यासयुक्तीचा सहज, सोपा आणि जीवनाला दिशा देणारा संदेश A message that gives direction to life

"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…

18 hours ago

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…

2 days ago

अयोध्येतील दानपेटी प्रकरण : श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कसोटी Ram Mandir Donation Box Case

स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…

2 days ago

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

3 days ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

4 days ago