February 4, 2026
Home » अनुवादातून राष्ट्रजोडणीचा संदेश देणारे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन पुण्यात
काय चाललयं अवतीभवती

अनुवादातून राष्ट्रजोडणीचा संदेश देणारे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन पुण्यात

पुणे : “विश्वव्यापी संपर्काचा खरा मंत्र म्हणजे अनुवाद” या विचाराला केंद्रस्थानी ठेवत कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने यंदाचे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन अनुवाद विषयाला समर्पित करण्यात आले आहे. सन २०१८ पासून दरवर्षी आयोजित होणाऱ्या या संमेलनाचा उद्देश सक्षम राष्ट्रनिर्मितीसाठी तरुणाईमध्ये आवश्यक वैचारिक, सांस्कृतिक व बौद्धिक गुणांचा विकास घडवणे हा आहे.

भारत हा विविध भाषा, संस्कृती आणि विचारप्रवाहांचा अनोखा संगम आहे. अशा देशात राष्ट्रजोडणीसाठी विविध भारतीय भाषांना एकमेकांशी जोडणे अत्यंत आवश्यक आहे. हे कार्य प्रभावीपणे साध्य करण्याचे महत्त्वाचे माध्यम म्हणजे भाषानुवाद. अनुवाद हा केवळ एका भाषेतून दुसऱ्या भाषेत केलेला शब्दप्रवास नसून, तो त्या-त्या प्रांतातील सांस्कृतिक, सामाजिक व वैचारिक देवाण-घेवाणीचा सशक्त पूल ठरतो, अशी भूमिका या संमेलनातून मांडली जाणार आहे.

फर्ग्युसन कॉलेजच्या फिरोदिया ऑडिटोरियममध्ये ही कार्यशाळा व संमेलन २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत तर २२ फेब्रुवारीला सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत होणार आहे.

‘अनुवादातून राष्ट्रजोडणी’ या संकल्पनेवर आधारित या संमेलनामध्ये अनुवाद क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ, अभ्यासक, लेखक व तरुण सहभागी यांच्यात वैचारिक आदान-प्रदान घडवले जाणार आहे. अनुवादाच्या तांत्रिक बाबी, बदलते माध्यमविश्व, रोजगाराच्या संधी तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सक्षम अनुवादक घडवण्यास प्रोत्साहन देणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

या निमित्ताने विनामूल्य अनुवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सहभागासाठी इच्छुकांनी https://forms.gle/RR3xQ2Py8x1kVVz99 या लिंकद्वारे नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९८६००८५११०, ९८८१३७३५८५

अनुवादाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा विचार व्यापक स्तरावर मांडणारे हे संमेलन अभ्यासक, विद्यार्थी, लेखक व भाषाप्रेमींना निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

यशवंतराव चव्हाण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विजय चोरमारे

विश्वभारती चळवळः भाषा भगिनींचा संवाद – आंतरभारतीतून घडलेली भारतीय एकात्मता

सिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थेचा काव्य पुरस्कार कवयित्री डॉ. योगिता राजकर यांना जाहीर

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading