विश्वाचे आर्त

तेही एक एक आघवे । चित्रिचे सिंहाडे मानावे । जैसे बोलोनि हाते घ्यावे । पुसोनियां ।। ( एकतरी ओवी अनुभवावी )

कोणतेही युद्ध मनाने प्रथम जिंकायचे असते. मनात तसा विचार निर्माण करायचा असतो. अध्यात्माचा विकास साधायचा असेल तर आपण मनाने तशी तयारी करायला हवी.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

 तेही एक एक आघवे । चित्रिचे सिंहाडे मानावे । 

जैसे बोलोनि हाते घ्यावे । पुसोनियां ।। 474 ।। अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ – ते देखिल एक एक पाहिले तर सर्वत्र भिंतीवर काढलेल्या सिंहाच्या चित्रासारखे ओल्या हाताने पुसून घेण्यास योग्य आहेत, असे समज.

युध्दभुमीवर योध्द्याला कसे प्रोत्साहन द्यायचे हे ज्ञानेश्वरीतून समजून घ्यायला हवे. शत्रूला कधीही मोठे मानायचे नाही. त्याचे भय कधीही घ्यायचे नाही. शत्रूला आपण जितके मोठे समजू तितके आपण कमजोर होतो. कारण आपली मानसिकता अशा विचाराने खचली जाते. मनामध्ये शत्रूचे भय कधीही ठेवायचे नाही. आपणाला त्याला निश्चित हरवू शकु असा आत्मविश्वास आपल्यामध्ये कायम ठेवायचा असतो. अशाने आपली मानसिकता प्रबळ होते. मन दुबळे करून कधीही शत्रूवर मात करता येत नाही.

आपण त्याला सहज हरवू असा भाव ठेवून मनाला प्रोत्साहित करायचे असते. तरच आपण शत्रूसमोर टिकू. युध्दात शत्रूला आपण कमजोर समजून आपल्या मनाला बळकट करू तितके आपण आत्मविश्वासाने त्याच्यावर मात करू शकतो. मन दुबळे करून, घाबरून शत्रूवर मात करता येत नाही. मनाला नेहमी आनंदी आणि धिट ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. शत्रूला इतके दुबळे समजायचे की आपण एखादे फळ्यावर काढलेले चित्र जसे सहज पुसून टाकू शकतो. इतक्या सहजतेने आपण या शत्रूवर मात करू शकतो. अशी मानसिकता आपण ठेवायची असते. युध्द भुमीवर अशी मानसिकता आपली असेल तर आपण अर्धी लढाई येथेच जिंकल्यासारखे आहे.

आपणाला एखादा आजार झाला आहे अशी मानसिकता आपण ठेवली तर आपणाला काहीही आजार नसतानाही आपण आजारी पडतो. कारण आपल्या विचाराचा आपल्या शरीरावर, आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. कोणतेही युद्ध मनाने प्रथम जिंकायचे असते. मनात तसा विचार निर्माण करायचा असतो. अध्यात्माचा विकास साधायचा असेल तर आपण मनाने तशी तयारी करायला हवी. आपले मन साधनेत रमवायला हवे. हे मला जमणार नाही. हे मला शक्य होणार नाही. ही मानसिकता आपण सोडायला हवी. प्रयत्न करत राहायचे असते. प्रयत्न सोडायचा नाही. प्रयत्नच केला नाही. जमणार नाही म्हणून बसून राहीलो तर आपण कधीच प्रगती साधू शकणार नाही. अध्यात्माची आवड असेल तर अध्यात्म काही अवघड नाही. स्वःची ओळख म्हणजे अध्यात्म. इतका सोपा अर्थ आहे.

मी कोण आहे ? याचा शोध घेणे म्हणजे अध्यात्म. खरे तर अध्यात्मात स्वतःचाच विकास साधला जातो. साधना जमत नाही म्हणून सोडून देणे म्हणजे युद्धातून पळून जाण्याचा प्रकार आहे. एकदा चुकेल दोनदा चुकेल. मी तर म्हणतो शंभरदा चुकेल. पण त्यानंतर तरी जमेल ना. जमणार नाही ही मानसिकता सोडली तर एका क्षणात आपणास सर्व काही हस्तगत होईल. हे लक्षात ठेवायला हवे. अध्यात्म विकास हा युद्ध भुमीवरील योद्धा सारखाच आहे. तशीच प्रबळ मानसिकता ठेवायची असते. अध्यात्म विकास हा आपल्या शरीराशी केलेले एक युद्धच आहे. आत्मज्ञान प्राप्तीसाठी स्वतःशी केलेले हे युद्ध आहे. तशी प्रबळ मानसिकता आपण ठेऊन या देहाशी आपण झगडायचे आहे. तरच आपण अध्यात्मिक विकास करू शकू. 

संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा अभ्यास एक तरी ओवी अनुभवावी असा या ग्रुपचा उद्देश आहे. मग होताय ना सहभागी..त्यासाठी लिंकवर क्लिक करा.
 https://www.facebook.com/groups/ShriDnyneshwariStudy

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तेंगबोचेची खडतर अन् रम्य वाट.. The difficult and beautiful path to Tengboche

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी भाग - ६ एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या प्रवासातील तेंगबोचेकडे जाणारा टप्पा म्हणजे हिमालयाच्या…

9 hours ago

ओअँसिसचा हिरवा श्वास अन् सहाराच्या वादळाचा काळा कहर The green breath of the oasis

सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने…

23 hours ago

क्षणाचाही विलंब नको : ज्ञानेश्वरीतील संन्यासयुक्तीचा सहज, सोपा आणि जीवनाला दिशा देणारा संदेश A message that gives direction to life

"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…

1 day ago

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…

3 days ago

अयोध्येतील दानपेटी प्रकरण : श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची कसोटी Ram Mandir Donation Box Case

स्टेटलाइन अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.…

3 days ago

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

4 days ago