July 27, 2024
call-for-submissions-for-ashirwad-award
Home » आशीर्वाद पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

आशीर्वाद पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

मुंबई: येथील वंदना प्रकाशन संस्थेतर्फे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी पुरस्कार देण्यात येतात. सन १९९७ पासून दरवर्षी आशीर्वाद पुरस्कार दिले जात आहेत. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील सर्व साहित्य प्रकारांना सन्मान चिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात येते. यासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन डॉ. सुनील सावंत यांनी केले आहे.

१ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०२३ या १३ वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती इच्छुक सहभागी लेखक, लेखिका, कवी, कवयित्री, प्रकाशक, वितरक व संबंधितांनी स्वतःच्या अतिअल्प परिचयासह संस्थेकडे पाठवाव्यात. ३० मे २०२४ पर्यंत या साहित्यकृती मुंबईतील पत्त्यावर पाठविण्यात याव्यात.

यंदा आशीर्वाद पुरस्कार प्रदान सोहळा दिवाळी २०२४ पूर्वी किंवा नंतर मुंबईत साजरा होईल. त्यावेळी पुरस्कार विजेत्यांना स्वखर्चाने सदर सोहळ्यास उपस्थित राहावे लागेल, ह्याची कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता :
डॉ. सुनील सावंत, ज्येष्ठ साहित्यिक व संस्थापक, ‘आशीर्वाद पुरस्कार ‘,
फ्लॅट नं. ६०४, चंद्रदर्शन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित,
आर. के. वैद्य मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई – ४०० ०२८.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९८१९१८२३२९.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

आरोग्य विमा धारकांना प्राधिकरणाचा महत्त्वपूर्ण दिलासा

ब्रह्माशी ऐक्य साधन्यासाठी…

लोकसभेतील बिनविरोध भाग्यवान…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading