📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 31, 2026
काय चाललयं अवतीभवती

रामकथा ब्रह्मांड भेदूनी गेली

book-review-of-ramkathamala

प्रस्तुत रामकथामालेत दिग्विजयाचा अप्रतिम परिचय सहजपणे करून देण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.

डॉ. सच्चिदानंद शेवडे

सहस्रावधी वर्षे रामकथा ही जनसामान्यांच्या मनाला भुरळ घालीत आहे, ती त्यातील आदर्शांमुळे होय ! ब्रह्मदेवांनी दिलेल्या आशीर्वादानुसार ही कथा आज विश्वभरात जाऊन पोचली आहे. प्रस्तुत रामकथामालेत याच दिग्विजयाचा अप्रतिम परिचय सहजपणे करून देण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.

वेदातील रामकथा, वाल्मिकी रामायण, रामायणातील रामकथा, व्यासांचे रामोपाख्यान, पुराणातील रामकथा, भासाचे प्रतिमानाटक, कालिदासाचे रघुवंश, प्रवरसेनाचे सेतुबंध, तुलसीदासांचे रामचरितमानस, एकनाथांचे भावार्थरामायण, गदिमांचे गीतरामायण, दक्षिणेतील रामायण, जैन, बौद्ध व सिख रामायण, विदेशातील रामायण, चित्रातील रामकथा, परदेशातील रामचित्रकथा, शिल्पातील रामकथा, नृत्य – नाट्यातील रामकथा, लोककलेतील रामायण, आधुनिक रामकथा, रामायणातील संदेशकाव्य, तारक रामायण, रामायण – एक सांस्कृतिक वारसा, रामायण – काल, आज आणि उद्या अशा चोवीस प्रकरणातून ही माला अलगद उलगडत जाते.

सोप्या आणि प्रवाही भाषेतील कथन हे दीपाली पाटवदकरांचा अभ्यास व विषयातील सामरस्य यांची जाणीव करून देते. विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग, पुणे यांनी हे अनेकरंगी आणि विविध शैलीतील रामायण चित्रांनी समृद्ध असलेले ११२ पृष्ठांचे सुबक पुस्तक अप्रतिम मुखपृष्ठ लेवून वाचकांसमोर सादर केले आहे. रामांना नव्हे तर रामायणाला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेले असे हे अनोखे पुस्तक आहे.

पुस्तकाचे नाव – रामकथामाला ( रामकथेच्या दिग्विजयाची कथा सांगणारी )

लेखिका – दीपाली नरेंद्र पाटवदकर

किंमत – २०० रुपये

प्रकाशक विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग, पुणे

संपर्क – ९८८१० ६१६८६

दीपाली पाटवदकर आणि डॉ सच्चिदानंद शेवडे

Related posts

केवळ आदिवासी व्यक्तींच्याच भूमिका असलेला भारतातील पहिलाच चित्रपट “धाबरी कुरुवी”

कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या काव्यसंग्रहाचे 22 रोजी प्रकाशन

चैत्र चाहूल २०२३ चे सन्मान जाहीर !

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!