India's Biggest Concerns in 2026: Unemployment, Corruption & Education | Ipsos What Worries the World
भारताच्या चिंतेचा कॅनव्हास ‘इप्सॉस’ (Ipsos) या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व्हेक्षण संस्थेने जून २०२६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘व्हॉट वरीज द वर्ल्ड’ या ताज्या अहवालाने हाच विरोधाभास समोर आणला आहे. ३० देशांमधील २२ हजारांहून अधिक लोकांचे मत आजमावल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. जगाला महागाई आणि गुन्हेगारीचा फटका बसतोय, तर भारतात मात्र ‘बेरोजगारी आणि भ्रष्टाचार’ या दोन मुद्द्यांनी सामान्य माणसाची झोप उडवली आहे. यावरच प्रकाश टाकणारा हा लेख... डॉ. रिता मदनलाल शेटीया, लेखिका अर्थशास्त्र विषयाच्या सहायक प्राध्यापिका आहेत.
जगाचा गाडा वेगाने पुढे पळतोय.तंत्रज्ञान रोज बदलतंय,जीवनशैली उंचावतेय,तरीही सामान्य माणसाच्या मनातली भीती आणि काळजी काही कमी झालेली नाही.पण एक रंजक गोष्ट म्हणजे,संपूर्ण जग ज्या गोष्टींनी चिंतेत आहे,भारताची चिंता मात्र त्यापेक्षा भलतीच वेगळी आहे.
भारतापुढील ४ मोठी आव्हाने:
जागतिक सरासरीचा विचार केला,तर भारतीय नागरिकांच्या मनातील भीतीची कारणे अगदी वेगळी आणि स्पष्ट आहेत:
१. हाताला काम कधी मिळणार? (बेरोजगारी – ४६%):
शहरी भागातील तब्बल ४६ टक्के भारतीयांसाठी बेरोजगारी हा देशापुढील सर्वात मोठा यक्षप्रश्न आहे. जागतिक पातळीवर हेच प्रमाण अवघे २९ टक्के आहे. हातात पदवीची कागदपत्रे असूनही योग्य दर्जाचा रोजगार न मिळणे, ही आजच्या तरुण पिढीची सर्वात मोठी खंत आहे.
२. कारभारातला ‘झोल’ आणि लाचखोरी (भ्रष्टाचार – ३४%):
भारतातील ३४ टक्के नागरिक आजच्या घडीला भ्रष्टाचाराने त्रस्त आहेत. जागतिक स्तरावर हा आकडा २८ टक्के आहे. प्रशासकीय कामांमधील पारदर्शकतेचा अभाव आणि पावलोपावली मोजावी लागणारी किंमत सामान्य माणसाला वैताग आणणारी ठरत आहे.
३. शिक्षणाचा दर्जा अन् वाढता खर्च (२२%):
भारतात शिक्षणाचा वाढता खर्च आणि रोजगाराशी नसलेला त्याचा थेट संबंध, यामुळे २२ टक्के लोक चिंतेत आहेत (जागतिक प्रमाण: १४%). केवळ पुस्तकी ज्ञान देण्याऐवजी मुलांना प्रत्यक्ष कामाचे शिक्षण मिळावे, अशी पालकांची अपेक्षा आहे.
४. निसर्गाचा कोप आणि प्रदूषण (हवामान बदल – २१%):
अनियमित पाऊस, असह्य उन्हाळा आणि वाढत्या प्रदूषणाचा शेती व आरोग्यावर होणारा परिणाम भारतीयांना स्पष्ट दिसतोय. म्हणूनच जागतिक सरासरीच्या (१३%) तुलनेत तब्बल २१ टक्के भारतीय हवामान बदलाबाबत कमालीचे चिंतित आहेत.
जग कशाने त्रस्त आहे?
भारताचे चित्र एकीकडे असताना, उर्वरित जगातील परिस्थिती मात्र वेगळी आहे. जागतिक स्तरावर गुन्हेगारी व हिंसाचार (३२%), वाढती महागाई (३२%) आणि गरिबी व सामाजिक विषमता (२९%) हे तीन मुद्दे अव्वल स्थानी आहेत. सायबर गुन्हे, गँग वॉर, इंधन-अन्नधान्याचे भडकलेले भाव आणि श्रीमंत-गरीब यांच्यातील वाढती दरी यामुळे जगातील बहुतांश देश होरपळून निघत आहेत. भारतात मात्र या तिन्ही समस्या जागतिक सरासरीच्या तुलनेत थोड्या कमी तीव्रतेने जाणवत आहेत.
काय आहेत उपाय?
या अहवालाने देशाच्या धोरणकर्त्यांसमोर एक उघडा आरसा धरला आहे. भारताला जर खरोखरच आर्थिक महासत्ता बनायचे असेल, तर खालील आघाड्यांवर तातडीने काम करावे लागेल.
जग काय करू शकते?:
जागतिक स्तरावरील गुन्हेगारी व महागाई रोखण्यासाठी देशांमधील आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सायबर सुरक्षा मजबूत करावी लागेल. युद्धांमुळे विस्कळीत होणारी अन्न व इंधनाची पुरवठा साखळी सुरळीत ठेवणे आणि श्रीमंतांवर न्याय्य कर लावून तो पैसा तळागाळातील लोकांच्या शिक्षणासाठी व आरोग्यासाठी वापरणे, हाच जगापुढील शाश्वत मार्ग आहे.
‘व्हॉट वरीज द वर्ल्ड’ हा अहवाल म्हणजे केवळ आकडेवारीचा खेळ नाही, तर तो देशाच्या धोरणकर्त्यांसाठी एक धोक्याची घंटा आहे. आज भारताकडे तरुणाईची खूप मोठी ताकद आहे. पण या तरुणांच्या हाताला जर वेळेत काम, भ्रष्टाचारमुक्त वातावरण आणि दर्जात्मक शिक्षण मिळाले नाही, तर ही ताकद देशापुढील सर्वात मोठे आव्हान बनू शकते. त्यामुळे वेळेवर दिलेला हा इशारा ओळखून ठोस पावले उचलणे, हेच देशाच्या हिताचे ठरेल!
पारंपरिक तंत्रज्ञानाकडून स्वायत्त सहकाऱ्याकडे होणारी वाटचाल आणि वृत्तगृहातील (Newsroom) आमूलाग्र बदल कृत्रिम बुद्धिमत्तेची पुढची उत्क्रांती…
राजाच्या आज्ञेची अक्षरे उमटलेला साधा चामड्याचा तुकडा संपूर्ण राज्यात अमूल्य ठरतो; कारण त्याचे मूल्य चामड्यात…
विचारांशी तडजोड न करणारे, सत्तेला आणि सनातनी व्यवस्थेलाही निडरपणे प्रश्न विचारणारे डॉ. कुमार सप्तर्षी आज…
शेती, शेतकरी आणि मातीच्या वेदनांना शब्दरूप देणारी कविता जेव्हा वास्तवाचा आरसा बनते, तेव्हा ती केवळ…
'एसईपीसी'च्या महासंचालकांचा ऐतिहासिक कोल्हापूर दौरा 'कोल्हापूर आयटी एक्सपोर्ट समिट २०२६' ला आयटी उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
फुटबॉल विश्वचषकमध्ये ५ हजार ४०० कोटी रुपयांच्या बक्षिसांची लयलूट जगभरातील तब्बल ६०० कोटी प्रेक्षकांचे लक्ष…