India's Biggest Concerns in 2026: Unemployment, Corruption & Education | Ipsos What Worries the World
भारताच्या चिंतेचा कॅनव्हास ‘इप्सॉस’ (Ipsos) या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व्हेक्षण संस्थेने जून २०२६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘व्हॉट वरीज द वर्ल्ड’ या ताज्या अहवालाने हाच विरोधाभास समोर आणला आहे. ३० देशांमधील २२ हजारांहून अधिक लोकांचे मत आजमावल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. जगाला महागाई आणि गुन्हेगारीचा फटका बसतोय, तर भारतात मात्र ‘बेरोजगारी आणि भ्रष्टाचार’ या दोन मुद्द्यांनी सामान्य माणसाची झोप उडवली आहे. यावरच प्रकाश टाकणारा हा लेख... डॉ. रिता मदनलाल शेटीया, लेखिका अर्थशास्त्र विषयाच्या सहायक प्राध्यापिका आहेत.
जगाचा गाडा वेगाने पुढे पळतोय.तंत्रज्ञान रोज बदलतंय,जीवनशैली उंचावतेय,तरीही सामान्य माणसाच्या मनातली भीती आणि काळजी काही कमी झालेली नाही.पण एक रंजक गोष्ट म्हणजे,संपूर्ण जग ज्या गोष्टींनी चिंतेत आहे,भारताची चिंता मात्र त्यापेक्षा भलतीच वेगळी आहे.
भारतापुढील ४ मोठी आव्हाने:
जागतिक सरासरीचा विचार केला,तर भारतीय नागरिकांच्या मनातील भीतीची कारणे अगदी वेगळी आणि स्पष्ट आहेत:
१. हाताला काम कधी मिळणार? (बेरोजगारी – ४६%):
शहरी भागातील तब्बल ४६ टक्के भारतीयांसाठी बेरोजगारी हा देशापुढील सर्वात मोठा यक्षप्रश्न आहे. जागतिक पातळीवर हेच प्रमाण अवघे २९ टक्के आहे. हातात पदवीची कागदपत्रे असूनही योग्य दर्जाचा रोजगार न मिळणे, ही आजच्या तरुण पिढीची सर्वात मोठी खंत आहे.
२. कारभारातला ‘झोल’ आणि लाचखोरी (भ्रष्टाचार – ३४%):
भारतातील ३४ टक्के नागरिक आजच्या घडीला भ्रष्टाचाराने त्रस्त आहेत. जागतिक स्तरावर हा आकडा २८ टक्के आहे. प्रशासकीय कामांमधील पारदर्शकतेचा अभाव आणि पावलोपावली मोजावी लागणारी किंमत सामान्य माणसाला वैताग आणणारी ठरत आहे.
३. शिक्षणाचा दर्जा अन् वाढता खर्च (२२%):
भारतात शिक्षणाचा वाढता खर्च आणि रोजगाराशी नसलेला त्याचा थेट संबंध, यामुळे २२ टक्के लोक चिंतेत आहेत (जागतिक प्रमाण: १४%). केवळ पुस्तकी ज्ञान देण्याऐवजी मुलांना प्रत्यक्ष कामाचे शिक्षण मिळावे, अशी पालकांची अपेक्षा आहे.
४. निसर्गाचा कोप आणि प्रदूषण (हवामान बदल – २१%):
अनियमित पाऊस, असह्य उन्हाळा आणि वाढत्या प्रदूषणाचा शेती व आरोग्यावर होणारा परिणाम भारतीयांना स्पष्ट दिसतोय. म्हणूनच जागतिक सरासरीच्या (१३%) तुलनेत तब्बल २१ टक्के भारतीय हवामान बदलाबाबत कमालीचे चिंतित आहेत.
जग कशाने त्रस्त आहे?
भारताचे चित्र एकीकडे असताना, उर्वरित जगातील परिस्थिती मात्र वेगळी आहे. जागतिक स्तरावर गुन्हेगारी व हिंसाचार (३२%), वाढती महागाई (३२%) आणि गरिबी व सामाजिक विषमता (२९%) हे तीन मुद्दे अव्वल स्थानी आहेत. सायबर गुन्हे, गँग वॉर, इंधन-अन्नधान्याचे भडकलेले भाव आणि श्रीमंत-गरीब यांच्यातील वाढती दरी यामुळे जगातील बहुतांश देश होरपळून निघत आहेत. भारतात मात्र या तिन्ही समस्या जागतिक सरासरीच्या तुलनेत थोड्या कमी तीव्रतेने जाणवत आहेत.
काय आहेत उपाय?
या अहवालाने देशाच्या धोरणकर्त्यांसमोर एक उघडा आरसा धरला आहे. भारताला जर खरोखरच आर्थिक महासत्ता बनायचे असेल, तर खालील आघाड्यांवर तातडीने काम करावे लागेल.
जग काय करू शकते?:
जागतिक स्तरावरील गुन्हेगारी व महागाई रोखण्यासाठी देशांमधील आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सायबर सुरक्षा मजबूत करावी लागेल. युद्धांमुळे विस्कळीत होणारी अन्न व इंधनाची पुरवठा साखळी सुरळीत ठेवणे आणि श्रीमंतांवर न्याय्य कर लावून तो पैसा तळागाळातील लोकांच्या शिक्षणासाठी व आरोग्यासाठी वापरणे, हाच जगापुढील शाश्वत मार्ग आहे.
‘व्हॉट वरीज द वर्ल्ड’ हा अहवाल म्हणजे केवळ आकडेवारीचा खेळ नाही, तर तो देशाच्या धोरणकर्त्यांसाठी एक धोक्याची घंटा आहे. आज भारताकडे तरुणाईची खूप मोठी ताकद आहे. पण या तरुणांच्या हाताला जर वेळेत काम, भ्रष्टाचारमुक्त वातावरण आणि दर्जात्मक शिक्षण मिळाले नाही, तर ही ताकद देशापुढील सर्वात मोठे आव्हान बनू शकते. त्यामुळे वेळेवर दिलेला हा इशारा ओळखून ठोस पावले उचलणे, हेच देशाच्या हिताचे ठरेल!
गुरू आणि शिष्य यांचा एकांतातील संवाद हा केवळ दोन व्यक्तींमधील उपदेश नसतो; तो आत्मज्ञानाच्या अनंत…
अंतिम अधिसूचनेवर २५ सप्टेंबरपर्यंत सूचना, हरकती नोंदविण्याची संधी; डॉ. मधुकर बाचुळकर यांचे आवाहन कोल्हापूर :…
देव कुठे आहे? मंदिराच्या गाभाऱ्यात, एखाद्या मूर्तीत, की आपल्या जीवनाच्या वाटेवर भेटणाऱ्या प्रत्येक जीवामध्ये? हा…
माझे भारतीयत्व भारतीयत्व म्हणजे नक्की काय? केवळ हातात तिरंगा घेणे, राष्ट्रगीत म्हणणे किंवा देशभक्तीच्या घोषणा…
तवायफ की स्वरसम्राज्ञी? ग्रामोफोनच्या तबकड्यांवर अमर झालेल्या सुरकन्यांची कहाणी एकेकाळी राजे-रजवाड्यांच्या दरबारात, नवाबांच्या महफिलींत आणि…
पिंपरी: महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष प्रा. राजन लाखे यांची बिनविरोध फेरनिवड…