July 2, 2025
Ramesh Varkhede speech on New way to Study Sant Tukaram
Home » संत तुकारामांच्या अभंगामध्ये वैचारिक वारसा टिकवण्याचे सामर्थ्य – रमेश वरखेडे
काय चाललयं अवतीभवती गप्पा-टप्पा व्हिडिओ स्पर्धा परीक्षा, शिक्षण

संत तुकारामांच्या अभंगामध्ये वैचारिक वारसा टिकवण्याचे सामर्थ्य – रमेश वरखेडे

कोल्हापूरः संत तुकारामांच्या अभंगामध्ये वैचारिक वारसा टिकवण्याचे सामर्थ्य आहे असे प्रतिपादन डॉ. रमेश वरखेडे यांनी केले.

ते शिवाजी विद्यापीठातील संत तुकाराम अध्यासनाच्यावतीने आयोजित तुकाराम अभ्यासाच्या नव्या दिशा या विषयावरील व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

ते पुढे म्हणाले की तुकारामांच्या अभंगाकडे नव्या पिढीच्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पहायला हवे. तुकारामांच्या अभंगांचा अस्तित्वलक्षी, संस्कृतीकेंद्री, सांप्रदायिक, अभंगाचे सावळे सौंदर्यशास्त्र इत्यादी पद्धतीने अभ्यास करता येतो.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रणधीर शिंदे होते. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये तुकारामांच्या अभंगातील कवित्वाचा शोध संशोधक विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. तसेच तुकारामांकडे कवी म्हणून कसे पहावे याचे विवेचन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. सूत्रसंचालन सुस्मिता खुटाळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ. मंगला वरखेडे, डॉ. अरूण शिंदे, डॉ. गोमटेश्वर पाटील, तसेच मराठी विभागातील संशोधक विद्यार्थी, एम.ए. चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading