September 8, 2024
medicinal importance of ajwain ova plant leaves
Home » ओव्याची पानं खाण्याचे फायदे
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ओव्याची पानं खाण्याचे फायदे

१. शरीर डिटॉक्स होते –

ओव्याची पानं हे एक उत्तम नैसर्गिक डिटॉक्स आहे. या पानांचा काढा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे थोडी ओव्याची व तुळशीची पानं एकत्र करुन त्याचा काढा तयार करावा. त्यानंतर त्यात २-३ थेंब लिंबाचा रस मिक्स करावा व हा काढा घ्यावा. त्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यासोबतच शरीराचं हायड्रेशन देखील होते. तसेच शरीराची रोग प्रतिकार क्षमता वाढते.

२. पोटदुखी दूर होते –

साधारणपणे कधीही आपलं पोट दुखू लागलं की आपण ओवा खातो. त्याचप्रमाणे जर तुमच्या घरी ओव्याचं झाड असेल तर ओव्याऐवजी त्याची पानं खा. या पानांमुळे पोटदुखी दूर होण्यासोबतच जठर व आतड्याची ( गॅस्ट्रोइंटेस्टइनची ) समस्यादेखील बरी होते.

३. पचनक्रिया सुधारते –

आपलं अन्नपचन जर नीट झालं नाही तर अनेक शारीरिक समस्या डोकं वर काढतात. यात पोटदुखी, अॅसिडिटी, जळजळ, पित्त होणे अशा समस्या हमखास होतात. त्यामुळे दिवसातून एकदा तरी ओव्याचं कोवळं पान खावं. त्यामुळे पचनक्रिया सुधारते व भूक देखील वाढते.

४. तोंडाची दूर्गंधी दूर होते –

दिवसभर आपण अनेक वेगवेगळे पदार्थ खात असतो. त्यामुळे सहाजिकच हे अन्न कण दातांमध्ये अडकून तोंडाला दुर्गंधी येते. म्हणूनच ही दुर्गंधी दूर करायची असेल तर दररोज जेवण झाल्यावर ओव्याचं पान खावं.

५. सर्दी-खोकला बरा होतो –

सर्दी किंवा खोकला झाल्यास ओव्याची ७-८ पानं घेऊन ते एक ग्लास पाण्यात उकळावीत. त्यानंतर हे पाणी अर्धा ग्लास होईल इतकं आटवावं. त्यानंतर हे पाणी गार झाल्यावर गाळून त्यात मध टाकून प्यावं.

६, सुंदर त्वचेसाठी –

रोज काही ओव्याची पाने आणि आले अर्धा इंच याचा रस डाळिंबाच्या रसात मिसळून पिला तर त्वचा व केस सुंदर आणि मुलायम होतील.

डॉ. मानसी पाटील


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

नैसर्गिक क्रियेतूनच आत्मज्ञानाचा प्रकाश

उत्तम साधनेसाठी हवा योग्य आहार

एक जिल्हा एक उत्पादन योजनेबद्दल उत्तर प्रदेशातील विश्वकर्मांनी पंतप्रधानांचे मानले आभार

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading