📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 4, 2026
काय चाललयं अवतीभवती

नामदेव चैतन्य साहित्य पुरस्कार जाहीर

Namdev Chitanya Sahitya Puraskar Miraj

मिरज येथे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ व मिरज हायस्कूलच्यावतीने नामदेव चैतन्य साहित्य संमेलन भरवण्यात येते. यामध्ये नामदेव चैतन्य साहित्य पुरस्कार विविध साहित्य कृतींना देण्यात येतात. यंदा हे संमेलन रविवारी (१३ ऑगस्ट) मिरज हायस्कूलच्या सांस्कृतिक हॉलमध्ये होणार असून सकाळी ९ वाजता महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये साहित्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

जाहीर साहित्य पुरस्कार असे –

नामदेव भोसले स्मृती साहित्य सेवा पुरस्कार – विजय जाधव ज्येष्ठ साहित्यिक, बुरुंगवाडी.
नामदेव भोसले स्मृती सामाजिक सेवा पुरस्कार – डॉ. शिरीष चव्हाण मिरज.
नामदेव भोसले स्मृती ग्रामीण वाचनालय पुरस्कार – कर्मवीर भाऊराव पाटील वाचनालय, इ. धामणी

कै. चैतन्य माने, कै. विवेक माने, स्मृती साहित्य पुरस्कार असे –

श्री. प्रणव माने यांच्याकडून
चैतन्य माने स्मृती साहित्य पुरस्कार – ‘झांजडझगडा’ – विक्रम राजवर्धन
विवेक माने स्मृती साहित्य पुरस्कार – ‘बारा गावचं संचित’ – जयवंत आवटे

कै. प्रकाश कोरे, कै. अशोक कोरे, स्मृती साहित्य पुरस्कार-

उद्योगपती बाबुराव कोरे (शिव ऑफसेट) यांच्याकडून
प्रकाश कोरे स्मृती साहित्य पुरस्कार – ‘सांजात’ प्रताप वाघमारे
अशोक कोरे स्मृती साहित्य पुरस्कार – ‘प्रेमफुलांची ओंजळ’ प्रा. अनिलकुमार पाटील, हिंगणगाव

Related posts

दहा वर्षाच्या संदीपचे १३ गोष्टींचे पुस्तक प्रकाशित

राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा २०२४ आणि २०२५ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

जी-20 आणि भारताचे अध्यक्षपद

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406