fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 4, 2026
Home » अवकाळीची व्याप्ती ८ जिल्ह्यात, गारपीटीचीही शक्यता
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अवकाळीची व्याप्ती ८ जिल्ह्यात, गारपीटीचीही शक्यता

Extent of inclement weather, hailstorm is also possible in 8 districts

‘अवकाळीची व्याप्ती ८ जिल्ह्यात, गारपीटीचीही शक्यता ‘

माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ

शनिवार (ता.१६) ते बुधवार (ता.२०) पर्यंतच्या पाच दिवसात विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर ,गडचिरोली तसेच मराठवाड्यातील नांदेड अश्या एकूण ८ जिल्ह्यात व लगतच्या परिसरात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी (विजा, वाऱ्यासहित) पावसाची शक्यता जाणवते. ह्या पाच दिवसात ८ जिल्ह्यात व लगतच्या परिसरात काही ठिकाणी (विशेषतः१९ मार्चला अधिक) गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

खानदेशात केवळ ढगाळ वातावरण

खान्देशातील ३ जिल्ह्यात मात्र केवळ ढगाळ वातावरण जाणवेल. तर महाराष्ट्रातील उर्वरित २५ जिल्ह्यात मात्र वातावरण कोरडे असण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी विचलित होवु नये, असेच वाटते.

उष्णतेत वाढ

महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर ह्या चार जिल्ह्यात मात्र उष्णतेत चांगलीच वाढ झालेली जाणवणार असुन दुपारचे कमाल तापमान ३८ ते ४० तर कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात ३४-३७ डिग्री से. ग्रेडपर्यंतही पोहोचू शकते, असे वाटते.
          मुंबईसह कोकणात मात्र अनपेक्षितपणे हा बदल जाणवणार नाही. तेथे दुपारचे कमाल तापमान केवळ सरासरीच्या खाली असुन २८-३० डिग्री से. ग्रेड दरम्यान असु शकते, असे वाटते.

पाऊस अन् बर्फवृष्टीही

एका पाठोपाठ असे दोन पश्चिमी झंजावात, १८ व २० मार्च (सोमवार व बुधवार) रोजी रात्री जम्मु काश्मिर, लेह-लडाख हिमाचल प्रदेश, उत्तराखंड अश्या उत्तर भारतातील पश्चिमी हिमालयीन ३ राज्यात, प्रवेशतील. त्याच्या परिणामातून तेथे २० ते २२ मार्च दरम्यानच्या ३ दिवसात पाऊस बर्फवृष्टी, थंडी जाणवेल. परिणामी महाराष्ट्रात जरी कमाल तापमानात वाढ जाणवत असली तरी पहाटेचे किमान तापमानात कमालीची वाढ अजुन जाणवणार नाही.

Related posts

उन्हाळी तीळ लागवड तंत्रज्ञान

आजीची भाजी रानभाजी – शेवर/शेवळी..

जलसंवर्धन चळवळीतून पाणी प्रश्नावर तोडगा

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!