दोन मिनिटे चहा देण्यास उशीर झाला तर घरात आरडाओरड सुरु होते. वेळेचे महत्त्व आहे की नाही असे शब्द साहजिकच तोंडातून बाहेर पडतात. इतक्या व्यस्त पिढीला साधना म्हणजे काय ? त्याचे फायदे काय आहेत ? इतका वेळ देऊन काहीच साध्य होत नसेल तर ती करायची कशासाठी ? या प्रश्नांची उत्तर मिळणे गरजेचे आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

जंववरी अर्जुना । तो बोध भेटेना मना ।
तवंचि यया साधना । भजावें लागे ।। 149 ।। ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा

ओवीचा अर्थ – अर्जुना, जोपर्यंत अंतःकरणात ज्ञान उत्पन्न होत नाही तोपर्यंतच या साधनांची खटपट करावी लागते.

साधना का करायची ? साधनेने आपणाला काय मिळते ? या प्रश्नांची उत्तरे नव्यापिढीला मिळाली तरच ते अध्यात्माकडे वळतील किंवा ते अध्यात्मावर विश्वास ठेवतील. अन्यथा हे सर्व म्हणजे वेळ फुकट घालवण्यातला प्रकार आहे असे समजून याकडे पाहणारही नाहीत. कारण सध्या विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की जग हे आता सेकंदावर चालू लागले आहे. पूर्वी रेल्वे किती तास उशाराने धावणार आहे हे सांगितले जायचे. त्यानंतर लोकल किती मिनिटाने उशीराने धावत आहे हे सांगीतले जाऊ लागले. आता मेट्रोचा दरवाजा किती सेकंद उघडा राहीले हे सांगितले जात आहे. म्हणजे तासावरून जग आता सेकंदावर धावू लागले आहे.

सेकंदावर कमाई मोजली जाऊ लागली आहे. वेबसाईट किती सेकंद पाहीली गेली किंवा जाहीरात किती सेकंदाची आहे यावर पैसे ठरवले जात आहेत. त्यावरच उत्पन्न मोजले जात आहे. म्हणजेच आता उत्पन्न सेकंदात मोजले जाऊ लागले आहे. इतका वेग जगाने पकडला आहे. या जमान्यातील नव्या पिढीला साधनेसाठी एक तास देणे काय पाच मिनिटे सुद्धा देणे कठीण वाटणार आहे. हे स्वाभाविक आहे. जग इतके वेगवान झाले आहे की अशावेळी पाच मिनिटांची फुरसतही मिळणे कठीण आहे.

प्रत्येक क्षण हा आता महत्त्वाचा झाला आहे. कार्यालयातही वेळेला महत्त्व आहे. आठ तासाच्या कामाचे मोजमाप केले जाऊ लागले आहे. अशा स्थितीत तासभर साधनेसाठी देणे म्हणजे फुकट वेळ घालवण्याचा प्रकार आहे असे वाटणे स्वाभाविक आहे. कामावर जाताना किंवा परतताना वाहतूक कोंडी पाच – दहा मिनिटांची असली तरी त्यावर चर्चा होऊ लागली आहे. कारण घरात पोहोचण्यासही उशीर होता कामा नये. इतके वेळेला महत्त्व आले आहे. मग अशावेळी साधनेला पाच मिनिटे बसणे म्हणजे फुकट वेळ घालवण्यासारखे आहे, असे वाटणे स्वाभाविक आहे.

दोन मिनिटे चहा देण्यास उशीर झाला तर घरात आरडाओरड सुरु होते. वेळेचे महत्त्व आहे की नाही असे शब्द साहजिकच तोंडातून बाहेर पडतात. इतक्या व्यस्त पिढीला साधना म्हणजे काय ? त्याचे फायदे काय आहेत ? इतका वेळ देऊन काहीच साध्य होत नसेल तर ती करायची कशासाठी ? या प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे. तरच त्यांचा अध्यात्मावर विश्वास बसेल. तरच ते याकडे वळतील अन्यथा हे सर्व थोतांड आहे असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतील.

साधनेसाठी दिलेल्या पाच मिनिटांनीही खूप काही मिळते. मनाला शांती मिळते. अंगातील राग शांत होतो. मन एका वेगळ्या वळणावर येते. सकारात्मक विचारांची पेरणी होते, विचारात झालेला हा बदल बोध येण्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. साहजिकच यामुळे कामामध्ये उत्साह वाढतो. या अशा अनेक फायद्याच्या गोष्टी साध्य होत असल्याने साधनेकडे मन वळते. मन रमते. विशेष म्हणजे धकाधकीच्या जीवनात पाच मिनिटांच्या साधनेने सर्व थकवा दूर होऊन शांत झोप लागते. यासाठी साधनेची सवय लावून घ्यायला हवी. साधना यासाठी गरजेची आहे. भावीकाळात याचे महत्त्व अधिकच वाटणार आहे हे नव्या पिढीने विचारात घ्यायला हवे.

साधनेत होणाऱ्या ज्ञानाचा बोध त्यांना समजावून सांगणे गरजेचे आहे. साधनेचा अनुभव येणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. जो पर्यंत त्या ज्ञानाचे महत्त्व पटणार नाही. अनुभुती येणार नाही तो पर्यंत हे सर्व थोतांड आहे असेच वाटणार. यासाठी साधना का करायची हे समजून घेणे गरजे आहे. साधनेची खटपट बोधापर्यंत आहे. एकदा बोध झाल्यानंतर पुन्हा पुन्हा बोध घेण्याची सवय लागते. या ज्ञानाच्या बोधातूनच मग आत्मज्ञानाची प्राप्ती होते. यासाठी या अंतःकरणात ज्ञानाचा बोध होणे महत्त्वाचे आहे तो पर्यंत साधना करत राहाणे गरजेचे आहे.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

मानवी मनाची सुंदरता टिपणारा भावविभोर कवितासंग्रह : निळी सावळी नव्हाळी Review of Nili Savali Navali Poetry Collection

प्रेम, निसर्ग, स्त्रीमन, सामाजिक जाणीवा आणि जीवनातील सूक्ष्म भावछटा यांचा सुरेल संगम घडवणारा 'निळी सावळी…

6 hours ago

‘मुक्त’ विद्यापीठाची वाटचाल खासगीकरणाकडे ? Open University moving towards privatization

गरीब, ग्रामीण आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी स्थापन झालेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आता खाजगी संस्थांच्या…

1 day ago

भारतीयत्व म्हणजे नेमके काय ? उत्तर सापडते भारतीय संविधानात ! Indianness ? The answer found in the Constitution !

भारतीयत्वाची माझी संकल्पना… आपण भारतीय आहोत म्हणजे काय आहोत ? आपला जन्म भारतामध्ये झाला आहे,…

1 day ago

विशेष आर्थिक लेखः राज्यांच्या वित्तीय कसरतीचे वास्तव गंभीरच Financial Reality of the states

देशातील बहुतेक सर्व राज्य सरकारांची आर्थिक स्थिती बऱ्याच प्रमाणात चिंताजनक आहे. प्रत्येक राज्याची स्थिती पाहिल्यास…

2 days ago

हुकूमाचा एक्का नि भाऊचा धक्का…ऑपरेशन टायगरने उबाठाची झोप उडवली Ekanath Shinde Operation Tiger

सहा खासदारांच्या पक्षांतराचा धक्का अजूनही सावरता न आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता विधान परिषदेचे…

2 days ago

प्रेमाने केलेले प्रत्येक कर्तव्य हीच खरी पूजा True Worship

मनुष्याला मोक्ष मिळण्यासाठी जन्म, जात, कुल, विद्वत्ता किंवा बाह्य कर्मकांड यांपेक्षा अंतःकरणातील निखळ प्रेम अधिक…

2 days ago