May 19, 2026
Home » मारोतराव नारायणे राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्‍‍मय पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

मारोतराव नारायणे राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्‍‍मय पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

Marotrao Narayan appeals to send literature for the state-level best literary award

मारोतराव नारायणे राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्‍‍मय पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

वर्धा – मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने मराठीतील साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कवितासंग्रह, कादंबरी, कथासंग्रह, वैचारिक साहित्य या प्रकारातील साहित्यकृतींना मारोतराव नारायणे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रा. डॉ. प्रमोद नारायणे यांनी दिली आहे.

चारही साहित्य प्रकारात प्रत्येकी ७,००० रूपये रोख, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १ जानेवारी २०२४ ते २० फेब्रुवारी २०२५ या काळात प्रकाशित झालेले कवितासंग्रह / कादंबरी/ कथासंग्रह / वैचारिक साहित्य पुरस्कारासाठी विचारात घेतले जाणार आहे. तरी पुस्तकाच्या तीन प्रती प्रा. डॉ. प्रमोद नारायणे, अध्यक्ष, मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठान, शाहू ले आऊट, प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयाजवळ, वर्धा ४४२००१ मोबाईल ९८५०३०९६६५ या पत्त्यावर २७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पाठवाव्या असे आवाहन करण्यात आले आहे.

२७ मार्च २०२५ रोजी या पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार असून २७ एप्रिल २०२५ रोजी मारोतराव नारायणे यांच्या स्मृतिदिनानिमित्य वर्धा येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होईल. तरी या पुरस्कारांसाठी जास्तीत जास्त साहित्यिकांनी आपले साहित्य पाठवावे, असे आवाहन मारोतराव नारायणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रमोद नारायणे, वर्धा ९८५०३०९६६५, सचिव हेमलता नारायणे, वर्धा ९०११८७८४८९, पुरस्कार संयोजन समिती सदस्य श्रीकांत पेटकर, कल्याण ९७६९२१३९१३, किशोर पेटकर, नागपूर ८८०६२४७६८६ डॉ. संदीप भेले, बदलापूर ९८८१४२२४५३, सूर्यकांत पाटील, वरोरा ९४२२१९१५२४ यांनी केले आहे.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयाचे पुरस्कार जाहीर

शुक्रवारी रात्री पाहायला मिळणार उल्कावर्षावाचा सुंदर नजारा

टाकावू वस्तूपासून सजवली सुंदर बाग…(व्हिडिओ)

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406