March 30, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी विचारांची डिजिटल नगरी

जाहीरातचे दर फलक

१. Call To Action (CTA) Banner जाहीरात

वेबसाइटच्या वरच्या भागात दिसणारा मोठा आकर्षक बॅनर

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ २,०००
३ महिने ₹ ५,०००
६ महिने ₹ १०,०००

२. Sponsored Advertisement Banner (Home Page Content)

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ ५००
३ महिने ₹ १,५००
६ महिने ₹ ३,०००

जाहीरातीसाठी संपर्क

व्यवस्थापक, इये मराठीचिये नगरी वेब पोर्टल
श्री अथर्व प्रकाशन

संपर्क – ९०११०८७४०६

```
Veteran playwright Premanand Gajvi president of sahitya vichar and samman sammelan
Home » साहित्य विचार आणि सन्मान संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी
काय चाललयं अवतीभवती

साहित्य विचार आणि सन्मान संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी

  • सावंतवाडीत 8 जानेवारी रोजी होणाऱ्या साहित्य विचार आणि सन्मान संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी
  • समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे आयोजन
  • खुल्या कविसंमेलनात सिंधुदुर्गातील कवींनी सहभागी होण्याचे आवाहन

सावंतवाडी – समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे रविवारी (ता. 8 जानेवारी) रोजी सायं. साडेपाच वाजता सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर सभागृह येथे साहित्य विचार आणि सन्मान संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात विविध साहित्य पुरस्कारांचे वितरण, खुले कविसंमेलन आणि सत्कार आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठांनचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि कार्यवाहक साटम यांनी दिली.

समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे दरवर्षी विविध साहित्यिक उपक्रम राबविले जातात. काही महिन्यापूर्वीच समाज साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता साहित्य विचार आणि सन्मान संमेलनाचे आयोजन नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. नाटककार गज्वी यांची भारतीय पातळीवरचे महत्त्वाचे मराठी नाटककार अशी ओळख आहे. त्यांच्या “घोटभर पाणी” या एकांकिकने प्रथम लक्ष वेधून घेतले. ही एकांकिका 14 भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाली.

तेंडुलकर-मतकरी आणि पुढे आळेकर-एलकुंचवार यांच्यानंतर स्वातंत्र्योत्तर मराठी नाटकांत तिसऱ्या पिढीचे पर्व सुरू झाले. गज्वी हे त्या पर्वातले अग्रगण्य नाटककार. किरवंत, गांधी आंबेडकर, गांधी विरुद्ध गांधी’, वांझ माती’, ‘तनमाजोरी’ ‘जय जय रघुवीर समर्थ’, ‘पांढरा बुधवार’, ‘रंगयात्री’, ‘व्याकरण’ त्यांच्या आदी नाटकांनी भारतीय प्रेक्षकांना विचार प्रवृत्त केले. या संमेलनात त्यांच्या हस्ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे यांना इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कार, तर कथाकार विवेक कुडू यांना काशीराम आत्माराम साटम स्मृती समाज साहित्य कथा पुरस्कार आणि कवी एकनाथ पाटील यांना प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

यावेळी श्रीराम वाचन मंदिराचे नूतन कार्याध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते ऍड.संदीप निंबाळकर यांचा विशेष गौरव नाटककार गज्वी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात कवी मोहन कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि नव्या कवींचे खुले कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कविसंमेलनात सहभागी होणाऱ्या कवीने पुढील व्यक्तींशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क मनीषा पाटील- (94228 19474), प्रा. प्रियदर्शनी पारकर – (94049 06570)

Related posts

अरागाम, काश्मीर येथे होणार दुसरे विश्व पंजाबी साहित्य संमेलन

हवामान बदलाचा शेतीवर घाव : उत्पादन निम्म्यावर येण्याची भीती

साखर सर्वत्र गोड तसे सर्वांच्याठायी असणारा आत्मा एकच

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!