April 1, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी विचारांची डिजिटल नगरी

जाहीरातचे दर फलक

१. Call To Action (CTA) Banner जाहीरात

वेबसाइटच्या वरच्या भागात दिसणारा मोठा आकर्षक बॅनर

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ २,०००
३ महिने ₹ ५,०००
६ महिने ₹ १०,०००

२. Sponsored Advertisement Banner (Home Page Content)

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ ५००
३ महिने ₹ १,५००
६ महिने ₹ ३,०००

जाहीरातीसाठी संपर्क

व्यवस्थापक, इये मराठीचिये नगरी वेब पोर्टल
श्री अथर्व प्रकाशन

संपर्क – ९०११०८७४०६

```
Home » मऱ्हाठिचिंये नगरी । ब्रह्मविद्येच्या सुकाळु करी ।
विश्वाचे आर्त

मऱ्हाठिचिंये नगरी । ब्रह्मविद्येच्या सुकाळु करी ।

मराठी ज्ञानभाषा व्हावी तिचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न केले तर भाषा आपोआपच टिकेल. मुळात मराठी भाषा ही अमर आहे हे विचारात घ्यायला हवे. हे अमरत्व कशाने आले आहे. याचाही विचार करायला हवा. चिंतन, मनन करायला हवे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मऱ्हाठिचिंये नगरी । ब्रह्मविद्येच्या सुकाळु करी ।

घेणे देणें सुखचिवरी । हो देई या जगी ।। 16 ।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 12 वा

ओवीचा अर्थ – या मराठी भाषेच्या गावांत आत्मज्ञानाची रेलचेल कर व या जगाला केवळ ब्रह्मसुखाचेंच घेणे देणे होऊ दे.

ज्ञानदानाची भाषा व्हावी

कोणतिही भाषा टिकण्यासाठी किंवा त्या भाषेच्या विस्तारासाठी ती ज्ञानभाषा होणे गरजेचे आहे. असे भाषा अभ्यासकांचे मत आहे. ज्ञानभाषा असेल तर त्या भाषेचा विकास झपाट्याने होतो. यासाठी तशा प्रकारच्या साहित्याची निर्मिती त्या भाषेत होणे तितकेच गरजेचे आहे. आज पृथ्वीतलावर अनेक भाषा बोलल्या जातात. त्यातील 7117 भाषा आजही वापरात आहेत. त्या बोलल्या जातात. पण यांची संख्या आता झपाट्याने घसरू लागली आहे. काही भाषा आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. तर काही लुप्तही झाल्या आहेत. भाषा टिकायची असेल तर ज्ञानदानाची भाषा व्हावी यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

सक्ती करून विकास अशक्य

नव्या तंत्रज्ञानामध्ये ही भाषा किती लोक वापरतात किती प्रमाणात वापरतात यावर ही भाषा घ्यायची की नाही त्याचा वापर नव्या तंत्रज्ञानात करायचा का नाही हे ठरवले जाते. फायदा नसेल तर भाषा कोण वापरणार हे सुद्धा महत्त्वाचेच आहे. सक्ती करून भाषेचा समावेश केला तर ते फायद्याचे ठरणारे नाही. सक्ती करून भाषेचा समावेश होईल खरा पण तिचा वापरच झाला नाही तर काय उपयोग. यासाठी भाषेच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची नितांत गरजेचे आहे. मराठी भाषेची सक्ती करून मराठी भाषेचा विकास होणार नाही हे विचारात घ्यायला हवे.

आत्मज्ञानाने मराठीला अमरत्व

मराठी ज्ञानभाषा व्हावी तिचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न केले तर भाषा आपोआपच टिकेल. मुळात मराठी भाषा ही अमर आहे हे विचारात घ्यायला हवे. हे अमरत्व कशाने आले आहे. याचाही विचार करायला हवा. चिंतन, मनन करायला हवे. ज्ञानेश्वरीतील आत्मज्ञानाने ही भाषा अमर झाली आहे. या भाषेतील आत्मज्ञानाची ओळख जगाला करून देण्याची गरज आहे. या आत्मज्ञानावरून ही भाषा जागतिक भाषा म्हणूनही विकसित होऊ शकते याचा विचार करायला हवा. यासाठी ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे या मराठी भाषेच्या नगरीत ब्रह्मविद्येचा सुकाळ करायला हवा. ही ब्रह्मविद्या विकसित करायला हवी. तो विचार मनामनात रुजवायला हवा. तसे झाले तर ही भाषा जगभरात बोलली जाईल जगभरात ही भाषा विकसित होईल. याचा वापर जगभर होईल. हे विचारात घ्यायला हवे. तसे प्रयत्न भाषेच्या विकासासाठी करायला हवेत. असे झाले तर मराठीचिये नगरी हे विश्वची माझे घर होईल. विश्वात मराठीच्या आत्मविद्येचा ब्रह्मविद्येचा सुकाळ होईल.  

Related posts

आठ वर्षात देशाच्या दूध उत्पादनात सुमारे 44 टक्के वाढ

“गंगा जमुना डोळ्यात उभ्या का ?… हे गीत पी सावळाराम यांना कसे सुचले..

गुरुकृपा अन् अनुभवाचे अविष्कार

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!