📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 9, 2026
काय चाललयं अवतीभवती

प्रकाश किरण प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

प्रकाश किरण प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील संभाजी उबारे, बा. स. जठार आणि डाॅ. सतीशकुमार आदगोंडा पाटील यांच्या साहित्याचा समावेश आहे.               

श्रीरामपूर येथील प्रकाश किरण प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय ग्रंथ पुरस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लेविन भोसले यांनी जाहीर केले आहेत. सन 2021 साठी विविध साहित्य प्रकारातील १२ लेखकास पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.  यामध्ये  नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या बारा वर्षांपासून पुरस्कार दिले जातात.

या वर्षाचे पुरस्कारांचे मानकरी असे…                     

 १)डोहतळ – मारुती कटकधोंड, राजस्वनगर, सोलापूर.

२) अस्तित्व – संभाजी उबारे, सांगरुळ, ता. करवीर.

३) एक भावविश्व – डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील, जयसिंगपूर ता. शिरोळ.     

4) गावकुसातल्या गोष्टी – डॉ. शिवाजी काळे, श्रीरामपूर.

५) अक्षरी – सुधाकर नथू भामरे, खुंटेवाडी, ता. देवळा

६) सतारीच्या तारा – अँथनी परेरा, वसई.

७) आई – वडील आणि आम्ही – शंकरराव अनारसे, श्रीरामपूर.                     

८) तुकोबांच्या कुळातील वंश – संतोष कांबळे, वडेले ता. मालेगाव.

९) फिरत्या चाकावरती – प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये, श्रीरामपूर   

१०) कोरोना: भयप्रद – भयकंपित इतिहास – प्रा. विजयकुमार भवारी , पुणे

११) कृतज्ञ मी… कृतार्थ मी – डॉ. श्रीकांत भालेराव -टाकळीभान.

१२) भाकरीची शपथ – बा. स. जठार – गारगोटी.   

या पुरस्कार वितरण सोहळ्याची दिनांक व ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती श्री, भोसले यांनी दिली आहे.

Related posts

अमळनेरला होणार ९७ वे मराठी साहित्य संमेलन

घटस्थापनेनिमित्त पंढरपूर विठ्ठल मंदिरात बांधलेली पुजा…

सुदर्शन चक्राद्वारेही लक्ष्यीत अचूक कारवाईसाठीची व्यवस्था विकसित करणार – नरेंद्र मोदी

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406