!-- afp header code starts here -->
April 21, 2026
httpsiyemarathichiyenagari.comwork-of-world-for-nature-awareness-is-commendable
Home » सांजड – जीवनाची वेगळी अनुभुती
गप्पा-टप्पा

सांजड – जीवनाची वेगळी अनुभुती

‘सांजड ‘ सुचिता घोरपडे यांचा नवा कथासंग्रह..

विनोदाची राणी आणि अभिनयाची सुपर फास्टर ट्रेन प्राजक्ता हनमघर या सुचिता घोरपडे यांच्या लाडक्या मैत्रीणीने ‘सांजड’ या कथासंग्रहावर व्यक्त केलेली प्रतिक्रिया..

सांजड या कथासंग्रहाबद्दल लेखिका सुचिता घोरपडे यांनी व्यक्त केलेले मनोगत

ग्रामीण जीवन आणि शेतीसंस्कृतीबद्दल माझ्या मनात एक हळवा कोपरा आहे. लहानपणापासूनच मला माझ्या आत्या-मावशीकडे जायला विशेष आवडायचं. त्यांच्या गावातील समाजजीवन वेगळं असायचं. आणि कदाचित त्याचमुळे मला ते वेगळेपण टिपताना निसर्गासोबत गुंतलेल्या मानवी भावनांची सोनेरी किनारपण स्पर्शून गेली. गावगाड्यातील अनेक कथा-व्यथा यांना जवळून अनुभवता आलं. सरणावर चढेपर्यंत भोगवटा न चुकेलेल्या ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांची स्थिती पाहून मन विचलित व्हायचं. त्या बायकांचे मनोविश्व टिपताना मनाचा तळ पार ढवळून निघायचा. मनाला डागण्या देणाऱ्या त्यांच्या मूक हुरद्याला मी कथेच्या रूपातून वाहू दिलं. गावातील अनेक गोष्टींनी मला लिहितं केलं. रांझणडोहाचं नितळ गहिरं पाणी, वाघदरीची वेडीवाकडे वळणे, गैबीचा पसरलेला भुंडा माळ, मसणवाट, आंबीरड्यावरलं भूत अशी अनेक ठिकाणे मनात घर करून बसली. पण मनात राहूनही ती माणसे, तो भवताल मला स्वस्थ बसू देईना.. मला लिहायला उद्युक्त करू लागला. आणि मग लिहिता लिहिता अनेक आठवणींच्या खकाण्यातील गोष्टी शब्दरूप घेऊ लागल्या. त्याचाच हा सांजड कथासंग्रह

सुचिता घोरपडे, लेखिका सांजड कथासंग्रह

या दशकातील कथालेखकांकडे चोखंदळ दृष्टीने पाहिले तर नव्या पिढीतील सुचिता घोरपडे या कथालेखिकेचे नाव अपेक्षा वाढविणारे आहे. आजच्या कथा लेखकांच्या कथा विश्वाचा विचार केला तर तिची कथा लक्षणीय वाटत जाते. आशयाचं सुप्त सामर्थ्य, माणसा-माणसातील प्रेम-दुभंग आणि सामाजिक व्यवहाराला तिची लेखणी वाचकांना गुंतवून ठेवते. नव्या वळणानं जन्माला घातलेल्या ग्रामीण संस्कृतीतील सहजगत्या बदलत्या मानसशास्त्राची ओळख करून देते. हा संदर्भ घेऊन सुचिताच्या कथा वाचल्या तर प्रत्येक दिवसाचा उषःकाल समाजाची जीवनमूल्ये बदलताना दिसतो. हा मानवी स्वभावाच्या रूपांतराचा प्रवास आहे. माणूस उकलून दाखवणं , मनात रुजत ठेवणं, तसेच सद्य स्थितीत चाललेल्या जगाचं चित्र तिची कथा नकळत सांगत जाते. अन्याय , अत्याचाराचा केलेला पंचनामा म्हणजे या कथा. माणूस आपल्या अस्तित्वासाठी वाट्याला येणाऱ्या परिस्थितीचा स्वीकार करतो. जीवनाची वेगळी अनुभूती म्हणून तिच्या ‘सांजड’ कथासंग्रहाकडे पाहता येईल.

महावीर जोंधळे

पुस्तकाचे नावः सांजड । कथासंग्रह
लेखक : सुचिता घोरपडे
प्रकाशक: सॅम पब्लिकेशन्स
मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
पृष्ठे : १३६ | किंमत : १८० ₹

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

क्षयरोगमुक्तीसाठी नव्या प्रभावी उपचार पद्धतीस मान्यता

ज्ञानामुळेच परमात्मा या वस्तूचा अनुभव

सवळा : माणदेशातील श्रमिकांचं जिणं मांडणारी कादंबरी

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!