May 30, 2026
Home » गोंधळ
मुक्त संवाद

गोंधळ

माये ! तुझं रूप मनामनात 
आरती घुमायची कानात

एकदा नागवेलीच्या 
हिरव्या तांड्यात..
मन दचकलं
तूच दिसू लागली 
पानापानात...

तान्डभर सळसळ
हवेची झुळूक...
मनावर शहारा 
भीतीची चुणूक...

बया दार उघड 
बया दार उघड 

संतांची वाणी
दाटते उरात
कळ लागते जीवघेणीे 

माये इथे तर 
सदाचीच फरफट
जिवाला काचणी
कोणापुढे घालावा

गोंधळ, तर
त्यांचीच मनमानी
शेवटी तुझाच
केवळ आधार 

निदान मन मोकळं 
करण्याचा पार..
बुडत्याला काडीचा आधार!


प्रतिमा इंगोले.९८५०११७९६९.

Related posts

गतकाळाच्या आठवणींनी गजबजलेलं गतस्मृतींची गजबज

कविता लिहिणे हा राजकीय हस्तक्षेपच असतो !

काळच उत्तर देईल : संभ्रमित वर्तमानाचा वेध घेणारा कविता संग्रह

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!