📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 30, 2026
मुक्त संवाद

गोंधळ

माये ! तुझं रूप मनामनात 
आरती घुमायची कानात

एकदा नागवेलीच्या 
हिरव्या तांड्यात..
मन दचकलं
तूच दिसू लागली 
पानापानात...

तान्डभर सळसळ
हवेची झुळूक...
मनावर शहारा 
भीतीची चुणूक...

बया दार उघड 
बया दार उघड 

संतांची वाणी
दाटते उरात
कळ लागते जीवघेणीे 

माये इथे तर 
सदाचीच फरफट
जिवाला काचणी
कोणापुढे घालावा

गोंधळ, तर
त्यांचीच मनमानी
शेवटी तुझाच
केवळ आधार 

निदान मन मोकळं 
करण्याचा पार..
बुडत्याला काडीचा आधार!


प्रतिमा इंगोले.९८५०११७९६९.

Related posts

सहज संस्कार घडवणाऱ्या बालकथा : गड्या आपुला गाव बरा

लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज ?

ब्युटी ऑफ लाईफ सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406