📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 14, 2026
काय चाललयं अवतीभवती

मूल येथे तीन डिसेंबरला महिला झाडीबोली साहित्य संमेलन

Zhadiboli Mahila Sahitya Samhelan in Mul

मूल येथे पहिले राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन

स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. रत्नमालाताई भोयर यांची निवड

साहित्यिकांना प्रेरणा देत नवसाहित्याची निर्मिती व्हावी म्हणून प्रसिद्ध झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर व झाडीबोली साहित्य मंडळ शाखा मूल यांच्यावतीने ३ डिसेंबर२०२३ ला बालविकास प्राथमिक शाळा मूल येथे पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलन आयोजित केलेले आहे . या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून कवयित्री प्रा. रत्नमालाताई भोयर , माजी नगराध्यक्ष नगर परिषद मूल तथा महिला अध्यक्ष झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर यांची निवड करण्यात आली आहे. प्रा. रत्नमाला भोयर यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रात भरीव कार्य असून त्यांची साहित्यिक म्हणून तीन कवितासंग्रह प्रकाशित झालेली आहेत . त्यांना विविध संस्थांमार्फत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. रत्नमाला भोयर यांची निवड झाल्याबद्दल झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण झगडकर, ज्येष्ठ मार्गदर्शक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, सचिव लक्ष्मण खोब्रागडे, मूल शाखेचे अध्यक्ष सुखदेव चौथाले , शशिकलाताई गावतुरे , वृंदा पगडपल्लीवार , सुनील बावणे , प्रभा चौथाले, नागेंद्र नेवारे , वर्षा भांडारवार , गणेश मांडवकर , विजय लाडेकर , नामदेव पीजदूरकर , परमानंद जेंगठे , पंडित लोंढे , प्रशांत भंडारे , रामकृष्ण चनकापुरे , सुनील पोटे , सुरेश डांगे , संतोष मेश्राम यांनी सभेचे आयोजन करून अभिनंदनाचा ठराव घेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले .

Related posts

शेकडो वर्षांच्या गुलामगिरीत पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरवण्याची वेळ – नरेंद्र मोदी

“… हा तर माणगाव परिषदेचा सन्मान!!!”

मुलांचे भावविश्व समृद्ध होण्यासाठी सकस बालसाहित्याची आवश्यकता

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!