📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 16, 2026
काय चाललयं अवतीभवती

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या अध्यक्षपदी भीमराव धुळुबुळू

Bhimrao Dhulubule New President of Damasa Sabha

दमसा सभेच्या अध्यक्षपदी भीमराव धुळुबुळू यांची निवड

कार्याध्यक्षपदी दि. बा. पाटील, कार्यवाहपदी विनोद कांबळे, संपादकपदी हिमांशू स्मार्त

कोल्हापूरः दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या अध्यक्षपदी प्रा. भीमराव धुळुबुळू तर कार्याध्यक्षपदी दि. बा. पाटील यांची निवड एकमताने करण्यात आली. कार्यवाहपदी डॉ. विनोद कांबळे, तर दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या संपादकपदी हिमांशू स्मार्त यांची निवड करण्यात आली.

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या कार्यकारिणीची बैठक विजय चोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. महाराष्ट्र शासनाच्या राजर्षी शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य सचिवपदी निवड झाल्यामुळे नव्या जबाबदारीला न्याय देता यावा यासाठी `दमसा`च्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती चोरमारे यांनी केली, त्यानुसार कार्यकारिणीने नव्या निवडी केल्या. उपाध्यक्ष भीमराव धुळुबुळू यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष प्रा. वि. द. कदम यांनीही नव्या पिढीकडे जबाबदारी देण्यासाठी थांबण्याचा निर्णय घेतला, त्यांच्याजागी कादंबरीकार दि. बा. पाटील यांची निवड करण्यात आली.

नवी कार्यकारिणी अशीः अध्यक्ष – प्रा. भीमराव धुळुबुळू, कार्याध्यक्ष – दि. बा. पाटील, उपाध्यक्ष – गौरी भोगले, कार्यवाह – डॉ. विनोद कांबळे, खजिनदार – श्याम कुरळे, सदस्य – डॉ. विजय चोरमारे, पाटलोबा पाटील, विलास माळी, नामदेव भोसले, डॉ. चंद्रकांत पोतदार आणि विक्रम राजवर्धन.

सल्लागार मंडळ – प्रा. चंद्रकुमार नलगे, प्राचार्य विश्वास सायनाकर, प्रा. वि. द. कदम, पी. सी. पाटील, डॉ. सौ. प्रमिला जरग, नामदेव माळी आणि डॉ. दीपक स्वामी.

Related posts

राज्यस्तरीय मातृस्मृती साहित्य पुरस्कार जाहीर

मराठी साहित्य संमेलनासाठी कवींना आवाहन

जयंत नारळीकर यांना ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया गोविंद स्वरूप जीवनगौरव पुरस्कार

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406