📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 12, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

प्रकाश सापळा तंत्रज्ञान काय आहे जाणून घेऊ या

light trape natural pest management article by Uttam Sahane

भाजीपाला, फळपिकांना आणि फुलपिकांना नुकसान करणाऱ्या किडीमध्ये बहुतेक कीटक हे निशाचर वर्गातील आहेत. म्हणजे रात्री फिरत असतात आणि नर मादीचे मिलन रात्रीच होत असते.
दुसरी गोष्ट म्हणजे रात्री हे कीटक बल्ब च्या प्रकाशाकडे आकर्षित होतात. कीटकांच्या याच सवयीचा उपयोग कीड नियंत्रणात केला जाऊ शकतो.

प्रकाश सापळा:

शेतात कीड येण्याच्या कालावधीत जमिनीपासून ४ ते ५ फूट उंचीवर एक बल्ब लावा. त्याच्या अर्धा ते एक फूट खाली पाण्याचे भांडे ठेवा. या पद्धतीने साधा कमी खर्चाचा प्रकाश सापळा तयार होतो.
रात्री बल्ब च्या प्रकाशाकडे कीटकांचे प्रौढ आकर्षित होतात. यात नर आणि मादी असे दोघे आकर्षित होतात. हे कीटक सुरुवातीला बल्ब च्या प्रकाशाने बल्ब भोवती गोल गोल फिरत असताना बल्ब खाली ठेवलेल्या पाण्याला स्पर्श होताच बुडून मरतात. अशा प्रकारे किडींचे नियंत्रण मिळते.

कोणत्या पिकांना, कोणत्या किडींसाठी उपयोग करावा?

सर्व प्रकारचा भाजीपाला पिकांत बोंड अळी, लष्करी अळी, तुडतुडे, खोडकिड, भातामधील खोड कीड, पाने खाणाऱ्या अळीचा पतंग इ. फळपिके आंबा, काजू, चिकू इ मधील किडी जसे खोडकिडा, फळ पोखरणारी अळी, चिकूमधील बी खाणारी अळी, कळी पोखरणारी अळी ई.
फुलपिके सोनचाफा, मोगरा, झेंडू मधील कळी खाणारी अळी, लष्करी अळी इ.

प्रमाण: एक एकरात एक सापळा
सापळ्यातील बल्ब चालू ठेवण्याची वेळ:
रात्री 7 ते 10 वाजता बब्ल चालू ठेवा त्यांनतर बंद करा. कारण रात्री उशिराने मित्र कीटक प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि पाण्यात बुडून मरतात.

बाजारात विविध आकारात प्रकाश सापळे उपलब्ध आहेत. तसेच सोलर शक्तीवर चालणारे स्वयंचलित प्रकाश सापळे ही मिळतात त्यांचाही उपयोग करू शकतात.

Related posts

नाताळातही थंडी, पण नववर्ष सलामीला थंडी होणार कमी

कपाशीवरील फुलकिडींचे नियंत्रण

…अशाने सह्याद्री पायथा निर्मनुष्य होईल !

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406