📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 26, 2026
कविता

रंगातच उरला नाही रंग…

No Colour in Colours Poem By Shripad Bhalchandra Joshi

रंगातच
उरला नाही रंग
सारेच बेरंग
बेढंग

रंगणार कशात
नेमके कोण
आपलीच नशा
आपलाच दृष्टिकोण

फेकली जातेय
ती तर नुसतीच घाण आहे
बघणारे तरीही म्हणतात,
छान आहे

त्यातच लोळणे,
त्यातच घोळणे
तोच सूड,तोच द्वेष
पिऊन तर्र,तोच त्वेष

रंग निव्वळ
मस्तीचा
नुसता
सुंदोपसुंदीचा

लावावा थोडा तरी
कुणी कुणाच्या अंगाला
असा तर तो
उरलाच नाही

अंगाला म्हणूनच
अंग लागत नाही
एकमेकात दंग तर
होतच नाही

जळते खरे तर
सुष्टच आहे
दुष्ट काहीच
जळत नाही

कथाही
म्हणून त्याच्या
कोणी आता
सांगत नाही

सारेच कसे
रंगहीन
आत बाहेर
सारखेच

जीवनच
झाले आहे
रंगांना
पारखे

श्रीपाद भालचंद्र जोशी

Related posts

चेहरा हरवलेल्या लेकी…

विसरू नको बापाला…

झाडे…!

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406