fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 16, 2026
Home »    उत्तर भारतात पुन्हा पाऊस व बर्फबारीचे आवर्तन
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

   उत्तर भारतात पुन्हा पाऊस व बर्फबारीचे आवर्तन

Manikrao Khul interview on weather forecast

लागोपाठ येणाऱ्या तीन पश्चिमी झंजावाताच्या साखळीतून संपूर्ण उत्तर भारत पुन्हा ओला होणार. सध्या तेथे पडत असणाऱ्या धुके व बर्फबारीबरोबरच पावसाची शक्यताही निर्माण झाली. त्यामुळे रविवार दि.४ फेब्रुवारी पर्यन्त थंडी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या महाराष्ट्रात पडत असलेली थंडी अजुन अशीच १ फेब्रुवारी पर्यन्त जाणवणार आहे. विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे १४ डिग्री से.ग्रेड(म्हणजे सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने, तर  पुणे सातारा कोल्हापूर सांगली व छ. सं.नगर येथे सरासरीपेक्षा दोन डिग्रीने अधि ) तर दुपारचे कमाल तापमान ३० डिग्री से. ग्रेड(म्हणजे सरासरी इतके) दरम्यानचे असु शकते, असे वाटते.   

विदर्भात मात्र पहाटेचे किमान तापमान हे १२ डिग्री से.ग्रेड(म्हणजे सरासरी इतके) तर दुपारचे कमाल तापमान २८ ते ३० डिग्री से. ग्रेड(म्हणजे सरासरी इतके) दरम्यानचे असु शकते, असे वाटते.   

उत्तर भारतातील थंडीचा परिणाम महाराष्ट्रवरही होवु शकतो. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान सरासरी इतके म्हणजे १४ डिग्री से.ग्रेड च्या आसपास राहू शकते. त्यामुळे नेहमीसारखी थंडी पहिल्या आठवड्यात जाणवेल.

नाशिक जिल्ह्यात मात्र पहाटेचे किमान तापमान सरासरी तापमानापेक्षा एक ते दिड डिग्रीने अधिक राहून म्हणजे १४ डिग्री से.ग्रेड च्या आसपास राहू शकते. त्यामुळे नेहमी पेक्षा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काहीशी कमी थंडी नाशिक जिल्ह्यात अनुभवायला मिळेल.  

Related posts

पडवळ..देई हाडांना बळ

स्त्रीवादाच्या पुढे जाऊन माणूसपणाची वाटचाल

शेतकरी साहित्याचे स्वरूप, दिशा

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!