📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 3, 2026
काय चाललयं अवतीभवती

डाॅ प्रतिमा इंगोले यांना गांधी फाऊंडेशनचा उत्कृष्ट कादंबरीकार पुरस्कार

Dr Pratima Ingole receives Gandhi Foundations Best Novelist Award

डाॅ.प्रतिमा इंगोले ह्यांना एकशेदहावा पुरस्कार जाहीर

डाॅ. प्रतिमा इंगोले ह्यांना नागपूर येथील डाॅ. गिरीश गांधी फाऊंडेशनचा उत्कृष्ट कादंबरीकार पुरस्कार जाहीर झाला आहे. पंचवीस हजार रुपये रोख, सन्मान पत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डाॅ प्रतिमा इंगोले ह्यांना मिळालेला हा एकशे दहावा पुरस्कार आहे.

महत्त्वाच्या कादंबरीकार म्हणून हा पुरस्कार डॉ. इंगोले यांना प्रदान करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत डॉ. इंगोले यांच्या सहा कादबंऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. पहिली कादंबरी ” बुढाईः जमिनीला आपोआप पडणारी भेग” ही भूमीविषयक कांदबरी असून तिला शासनाचा राज्य पुरस्कार मिळाला आहे. तर दुसरी “पार्टटाईम”ही कादंबरी शिक्षण क्षेत्रातील दुरवस्था चित्रित करणारी स्त्रीवादी कादंबरी आहे. कादंबरीकार ना.सी.फडके पुरस्कार या कादंबरीला प्राप्त झाला आहे.

तिसरी “आत्मघाताचे दशक”नावाची कादंबरी शेतकरी जीवनाचे विदारक चित्रण करणारी आहे. या कादंबरीला पद्मश्री विखे पाटील पुरस्कार व अन्य चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. डॉ. इंगोले यांच्या चौथ्या “बोडखी”नावाच्या नष्ट होणाऱ्या बलुतेदारीवर आधारित कादंबरीला महाराष्ट्रातील मान्यवर संस्थांचे चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तर “नक्षलग्रस्त या पाचव्या कादंबरीला जनसाहित्य पुरस्कारासह तुका म्हणे पुरस्कार व इतर पाच पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

डॉ. इंगोले यांची सहावी “राशाटेक”कादंबरी प्रकाशित झाली आहे. त्यांच्या कादंबऱ्यांवर महाराष्ट्रात पंचवीस अभ्यासक संशोधन करताहेत. सातवी कादंबरी “बाणगंगेतिरी”ही पंचमहाभूतांपैकी जलतत्वावर आधारित कादंबरी आहे. ती प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

एकशे दहा पुरस्कारापैकी सात पुरस्कार शासनाचे राज्य पुरस्कार आहेत. एक पुरस्कार सह्याद्री वाहिनीचा नवरत्न पुरस्कार मिळाला आहे.

Related posts

सामाजिक चळवळीचा महाग्रंथ

प्रसार माध्यमांनी स्वातंत्र्यलढ्यातील अज्ञात योद्ध्यांच्या शौर्यगाथा पुढे आणाव्यात – नरेंद्र मोदी

प्रा. भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406