जी गोरगरिबांची नव्हती
सामान्य माणसाची नव्हती
जी भिक मागणार्या
भिक्षुकाची कधीच नव्हती
ती गेली म्हणजे का शेतकर्याच्या मालाला
सोन्याचा दर आला की
कुणाच्या चुली बंद पडल्या
की आभाळ कोसळलं ?
ती बदनाम बदचलन तरी
धनिकांना अमृताचा घोट आहे
म्हणून तर आरबीआयचा
तिच्याशी घटस्फोट आहे
तुम्हाला सत्तेचा खेळ खेळत
नोटबंदीआड दडायचं आहे
आम्हाला तर रोज आभाळाकडे बघत
महागाईशी लढायचं आहे.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी
