📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 18, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

हिरवळीचे खत: ताग आणि धेंचा

Green manure crop jute and dhencha

हिरवळीचे खत : ताग आणि धेंचा

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
चांगले उत्पादन घेताना जमिनीचे आरोग्य अबाधित राखणे महत्त्वाचे आहे. तेव्हाच भविष्यात आपली जमीन शाश्वत उत्पादन देत राहील. जमिनीला सेंद्रीय खत देताना ताग किंवा धेंचा या खताच्या पिकांचा उपयोग दर २ ते ३ वर्षातून एकदा करायला हवा.
ताग किंवा धेंचा ही पिके वाढत असताना हवेतील नत्र भरपूर प्रमाणात जमा करतात. जेव्हा या पिकाला जमिनीत गाडतो तेव्हा पुढील पिकाला नत्र उपलब्ध होत असते.

या खत पिकांचा उपयोग कसा करावा?

पहिल्या पावसात ताग किंवा धेंच्या बियांची हाताने सारख्या प्रमाणात फोकुन पेरणी करावी. फळपिके असतील तर दोन ओळींच्या मध्ये जेथे सूर्यप्रकाश पोहचतो तेथे या पिकांची पेरणी करावी.

पेरणीसाठी एकरी प्रमाण:

ताग – 20 किलो प्रति एकर
धेंचा – 10 किलो बियाणे प्रती एकर

काढणी केव्हा करावी?

पिकाला जेव्हा फुले यायला सुरुवात होते तेव्हा ताग/धेंच्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने जमिनीत गाडून टाकावा. या स्थितीत झाडे कोवळी असतात त्यामुळे जमिनीत असलेल्या सूक्ष्म जीवांच्या मदतीने याचे चांगले विघटन होते व जमीन सुपीक व्हायला मदत होते.

फायदे:

१) जमीन सुपीक होऊन जलधारणा क्षमता वाढते.
२) पिकाला नत्र उपलब्ध होते त्यामुळे रासायनिक खतांची बचत होते.
३) जमिनीत उपयुक्त सूक्ष्म जीव जिवाणूची संख्या वाढण्यास मदत होते.
४) जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारण्यास मदत होते.

टीप:

शेतात पाणी साचत असेल अशा शेतात धेंच्या तर जेथे पाणी साचत नसेल तेथे ताग पेरावा.

Related posts

हवेचे प्रदूषण गांभिर्याने घेण्याचा विषय

परतीच्या मार्गावरील मान्सून सप्ताहभर जाग्यावरच थबकणार

नैसर्गिक उत्पादन प्रदर्शन, वेस्ट 2025 मध्ये अपेडाने केले भारताच्या सेंद्रिय उत्कृष्टतेचे प्रदर्शन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406