May 17, 2026
Shravani Poem Competition by Nakshatra Kavya Manch
Home » श्रावणी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन
काय चाललयं अवतीभवती

श्रावणी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन

२४ व्या राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन

चंद्रपूर: पुणे येथील भोसरीमधील नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रातील कवी कवयित्रींसाठी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही २४ वी राज्यस्तरीय स्पर्धा असून विनामुल्य व सर्वांसाठी ही स्पर्धा खुली आहे.

कवींनी श्रावण व निसर्ग या विषयावरील आपल्या स्वरचित कवितेच्या दोन रचना पाठवाव्या. विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात येते. यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक कवी कवयित्रींना सन्मानपत्र, गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल ही होणार आहे. कविता पाठविण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट २०२३ आहे. तरी जास्तीत जास्त कवींनी यात सहभाग नोंदविण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

कविता पाठविण्याचा पत्ता – प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे, राष्टीय अध्यक्ष – नक्षत्राचं देणं काव्यमंच, साई सदन, ए/३, महालक्ष्मी हाईटस, भोसरी, पुणे – ४११०३९ या पत्यावर पोष्टाने पाठवाव्यात.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

करवीर संस्थानमधील दत्तक प्रकरणावर एक दृष्टिक्षेप…

गुहागरच्या पसायदान प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

धनेश मित्र !

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406