📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 4, 2026
काय चाललयं अवतीभवती

तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

tilganga-sahitya-prerana-award-to-marathi-books

कादंबरी, कथा – कवितासंग्रहासाठी तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार व ललित लेख/प्रवासवर्णनासाठी तिळगंगा -प्रतिभा पुरस्कारासाठी पुस्तक पाठवण्याचे आवाहन

सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलन आणि साहित्यिक व सांगीतिक उपक्रम आयोजित करणाऱ्या तिळगंगा साहित्यरंग परिवार, संगीतरत्न कै. ग. रा. पाटील (तात्या) संगीत मंच आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्येष्ठ नागरिक सेवा संघ यांच्या वतीने साहित्य लेखनास प्रेरणा मिळावी म्हणून प्रथम कवितासंग्रह, कथासंग्रह आणि कादंबरीसाठी कवी, गझलकार विनायक गणपतराव कुलकर्णी पुरस्कार , सांगली पुरस्कृत स्व. गणपतराव शंकरराव कुलकर्णी ( तात्या ) जवळेकर स्मृती ‘तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार’ आणि प्रतिभा बुक्स, इस्लामपूर यांच्यावतीने ललित लेखसंग्रह / प्रवासवर्णनपर पुस्तकासाठी स्व. बाळासाहेब पाटील स्मृती ‘ तिळगंगा – प्रतिभा पुरस्कार ‘ प्रदान करण्यात येणार आहे.

१ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ या दोन वर्षाच्या कालावधीत प्रकाशित झालेल्या कविता, कथा व कादंबरी या साहित्यप्रकारातील साहित्यिकाच्या पहिल्या पुस्तकाला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि पुस्तकभेट असे या प्रेरणा पुरस्काराचे स्वरूप असून लेखक किंवा प्रकाशकांनी पुस्तकाच्या दोन प्रती, अल्पपरिचय १० जानेवारी २०२३ पर्यंत पाठवण्यात यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मान्यवर साहित्यिकांच्या परीक्षणातून या पुरस्काराची निवड करण्यात येणार असून हे पुरस्कार २२ जानेवारी २०२३ रोजी पेठ येथे होणाऱ्या तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येणार आहेत.

आनंदहरी, समन्वयक व मुख्य निमंत्रक, तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलन पेठ, ‘अद्वैत’ मंत्रीनगर, उपजिल्हा रुग्णालयानजीक, इस्लामपूर, जि. सांगली ४१५४०९ संपर्क :- ८२७५१७८०९९ / ९४२२३७३४३३ या पत्त्यावर पुस्तके पाठवावी असे आवाहन तिळगंगा साहित्यरंग परिवाराचे प्रमुख साहित्यिक मेहबूब जमादार यांनी केले आहे.

Related posts

माणुसकीच्या अस्ताचे शल्य अन् समाजातील वास्तवता…

प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाडःमय पुरस्कारांची घोषणा

श्रीमद् ग्रंथराज दासबोध…. “अभ्यास” करण्यासाठीचा ग्रंथ….!

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406