📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 20, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बेल (ओळख औषधी वनस्पतीची)

Aegle marmelos Bel Medicinal Plant

ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये  बेल या वनस्पतीबद्दल माहिती…

– सतिश कानवडे

संस्थापक,
औषधी वनस्पतीआरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल – 9850139011,9834884804

वनस्पतीचे नाव- बेल

वनस्पतीचे वर्णन

हा रुटेसी वनस्पती कुळातील वृक्ष. महादेवाला अभिषेक करण्यासाठी याची पाने वापरतात. याची पाने मध्यम उंचीची १० ते १२ मीटर उंच वाढणारी असून फांद्यांना काटे असतात. फळे ही चेंडूच्या आकाराची असून त्याचा गर औषधी असून त्याचा वास उग्र असतो.

औषधी उपयोग-

बेल या वृक्षाच्या फळामध्ये मार्मोलोसीन नावाचे द्रव्य आहे. तर खोडामध्ये कोमैरीन व अम्बारोफेरीन नावाचे द्रव्य असते. पानामध्ये तेलसापस्रे सालीमध्ये वायफैग्रीम व मारमेसीन ही द्रव्ये आढळतात. बेलाची मुले ही त्रीदोशामुळे होणाऱ्या तापावर गुणकारी, मूत्रविकार, पाठीच्या कण्यातील वेदना, हृदयाची धडधड आदीसाठी लाभदायक. पाने ही पाचक, सार्क, वात आणि कफ यांचा नाश करतात. तसेच नेत्रविकार, बधिरता व त्वचेला येणारी सूज यासाठी गुणकारी. फुले तृष्णा, तमन व अतिसार आदी आजारात वापरतात. पक्व फळे गोड चवीची असून क्षुधावर्धक/शक्तिवर्धक त्रिदोषनाशक आहे. मेंदू आणि हृदयाच्या स्वास्थ्यासाठी फळातील गर अतिशय उपयोगी आहे.

हवामान व जमीन

विविध हवामानाच्य प्रदेशात ही झाडे आढळतात. विशेषतः उत्तम निचरा होणाऱ्या पोयट्याच्या जमिनीत हमखास पाणी असणाऱ्या ठिकाणी बेलाची वाढ चांगली होते.

लागवड

पिकलेली फळे गोळा करून टी फोडावीत. त्यातील गर धुवून बिया वेगळ्या करून सावलीत सुकवून हवाबंद डब्यात ठेवाव्यात. मे/जून महिन्यात पेरणी करावी. लागवड शक्यतो हलकासा पाउस/ढगाळ वातावरणात करावी.

मशागत

दर तीन महिन्यांनी २५ ग्रॅम मिश्र खत द्यावे. वेळोवेळी पाणी द्यावे.

काढणी

२५ ते ३० वर्षे उत्पन्न येते. फळातील गर औषधी असल्याने त्याचा मुरंबा/ स्वेरा बनवून साठवण करता येते.

Related posts

प्रदूषणातून पुनर्जन्म : जगातील देश नद्या स्वच्छ कशा करत आहेत ?

आंबा पिकावरील विविध किटकांच्या संदर्भात…

‘गोड’ कडुनिंब…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406