📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 11, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गुढीपाडव्यापर्यंत ढगाळ वातावरण

Cloudy till Gudipadwa Manikrao Khule weather Forecast

अवकाळीचे वातावरण –

शनिवार (ता. ६ ) ते मंगळवार (ता.९ एप्रिल ) म्हणजे गुढीपाडव्यापर्यंतच्या ४ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. त्यातही विशेषतः गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी ( ता. ८ एप्रिलला ) विदर्भातील गोंदिया, भंडारा नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात व लगतच्या परिसरात अवकाळी पावसाची शक्यता अधिक जाणवते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष न घाबरता सावधानतेने पीक काढणीच्या कामाचे नियोजन करावे, असे वाटते.

 उष्णतेची स्थिती –

सध्या मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील दुपारी ३ चे कमाल तापमान हे ४० ते ४२ अंश सेल्सिअसच्या श्रेणीत जाणवत असुन साधारणपणे ते सरासरी कमाल तापमानापेक्षा ३ ते ४ अंशानी अधिक आहे.              

विदर्भात हीच उष्णता, ९८ व्या टक्केवारीत म्हणजे विदर्भाच्या ९८ व्या टक्केवारीपेक्षा अधिक परीक्षेत्रात भाग बदलत दुपारचे कमाल तापमान हे निम्न पातळीतील ४० अंश सेल्सिअस असुन उर्वरित २ टक्के पेक्षा कमी परिक्षेत्रात भाग बदलत निम्न पातळीतील ४० अंश सेल्सिअर कमाल तापमानपेक्षा अधिक म्हणजे ४१, ४२ अंश सेल्सिअस जाणवेल.

मुंबईसह कोकणात मात्र साधारणपणे दुपारचे कमाल तापमान सरासरी इतके म्हणजे ३२ ते ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास तर पहाटेचे किमान तापमानही सरासरीइतके म्हणजे २२ ते २४ अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता जाणवते. आणि उष्णतेची ही सर्व स्थिती महाराष्ट्रात आजपासुन ३ दिवस म्हणजे ६ एप्रिल पर्यन्त जाणवेल.
                              
उष्णतेची लाट व रात्रीचा उकाडा

विदर्भात काही ठिकाणी उद्या व परवा (५ व ६ एप्रिल शुक्रवारी व शनिवारी) दोन दिवस भाग बदलत दिवसा उष्णतेच्या लाटेची तर रात्री उकाड्याची स्थिती जाणवू शकते.

किनारपट्टीवर दमटयुक्त उष्णता –

मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात तसेच लगतच्या गोवा राज्यात उद्यापासून तीन दिवस म्हणजे ( ता. ५ ते  ७ एप्रिल ला, शुक्रवार ते रविवारपर्यन्त) तीन दिवस दिवसा दमटयुक्त उष्णतेचा अनुभव येईल.
              
कश्यामुळे आहे हे अवकाळीचे वातावरण ?

मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्हा परिसर ते कर्नाटक ओलांडून दक्षिण तामिळनाडूतील मदुराई जिल्हा परिसरा पर्यन्तच्या समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यन्त व काही किलोमीटर रुंदीत असलेले हवेच्या कमी दाबाचा आसाचे म्हणजेच वारा खंडितता प्रणालीत पसरलेल्या क्षेत्रात दोन्हीही, अरबी व बंगाल उपसागरातून उच्च दाबाच्या प्रत्यावर्ती चक्रीय आर्द्रतायुक्त पण विरुध्द दिशेने ताशी २० ते २५ किमी. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांच्या संगमातून सध्याच्या अवकाळीचे वातावरण तयार झाले आहे.

माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ

Related posts

कांद्याच्या सालीपासून खत…

निसर्गसंवर्धनाचा पंखधारी उत्सव : फुलपाखरांच्या जन्मकथेतून माणसाची जबाबदारी

चांगली निर्यात क्षमता असलेल्या 50 कृषी उत्पादनांची सारणीः अपेडा

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406