📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 20, 2026
काय चाललयं अवतीभवती

डॉ. अपर्णा पाटील यांच्या कावेरी कादंबरीचे शनिवारी प्रकाशन

Dr Aparna Patil Book Kaveri Publication

कोल्हापूर : डॉ. अपर्णा पाटील लिखित कावेरी या इंग्रजी भाषेतील कादंबरीचे प्रकाशन शनिवारी (ता. १६ सप्टेंबर ) रोजी होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. वाय. एस. पी. थोरात, डॉ. उषा थोरात, डॉ. मिलिंद एच. पटवर्धन, प्रसिद्ध लेखिका डॉ. माया पंडित उपस्थित राहाणार आहेत. शनिवारी (ता. १६) सायंकाळी साडेचार वाजता दसरा चौक येथील शाहू स्मारकमध्ये प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे.

डॉ. पाटील यांचे हे पाचवे पुस्तक असून यापूर्वी लहान मुलांच्या लघुकथा असणाऱ्या दियाज बागफुल ऑफ स्टोरीजचे दोन भाग, कोल्हापुरातील चौदा  उद्योजक महिलांच्या यशोगाथेवर आधारित स्मॉल इज द न्यु बीग, स्वतःच्या जीवनातील अनुभवावर आधारित लघुकथा  एन एंगेजिंग स्लाईस ऑफ लाईफ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच डॉ. पाटील यांच्या स्मॉल इज द न्यु बीग या पुस्तकाचे मराठी भाषांतर स्वप्ने लहान अन् उंच भरारी हे सुद्धा प्रकाशित झाले आहे.

प्रकाशन होणाऱ्या कावेरी या इंग्रजी कादंबरीबद्दल बोलताना डॉ. पाटील म्हणाल्या की इतर लोकांना काय वाटते या प्रमाणे आपण स्वतःला घडवत असतो. पण प्रत्यक्षात आपण स्वतःला स्वतःच्या ध्येयाप्रमाणे घडवायला हवे. सर्वांना आवडेल असे आपण कधीच होऊ शकत नाही. पण यासाठी आपण संघर्ष करत राहतो. यातच आपण स्वतःला हरवून घेतो. या ऐवजी आपण स्वतःला नित्य आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला तर  आपले जीवन अधिक सुसह्य होऊ शकते. आपण पाहीलेली स्वप्ने जरी गाठता आली नाहीत, तरी आपण खचून जातो. आपणासाठी देवाने काही स्वप्न पाहीले आहे यावर विश्वास ठेऊन आपण चालत राहायला हवे असा कावेरी या कादंबरीचा आशय आहे. कावेरी नावाच्या मुलीची ही जीवनगाथा असून त्यातून हा आशय उलघडत जातो.

Related posts

Photos : रामदास स्वामींचा जीवनपट मांडणारी समर्थ सृष्टी

शेती पंप वीज बिलांची दुरुस्ती करताना `ही` घ्या काळजी

मतदार जनजागृतीसाठी लोकशाही दौड

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!