📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 17, 2026
काय चाललयं अवतीभवती

ट्रायच्या नावाने फसवणूक

Fraud in the name of Telecom Regulatory Authority of India TRAI

नवी दिल्‍ली – भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या निदर्शनास आले आहे की नागरिकांना करण्यात येणारे फसवे व्हॉट्सॲप संदेश, एसएमएस आणि व्हॉईस कॉल हे ट्रायचे असल्याचा दावा करण्यात येत आहे. ट्रायच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधिकृत संप्रेषणाप्रमाणे बनवलेल्या बनावट नोटिसांचा वापर गुन्हेगार करत आहेत.

या नोटिस, प्राप्तकर्त्याच्या मोबाइल नंबरशी संबंधित बेकायदेशीर कृत्यांचा खोटा आरोप करतात आणि कायदेशीर अंमलबजावणीकरिता संपर्क साधण्यासाठी किंवा सेवा संपुष्टात आणण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणतात. नागरिकांनी प्रतिसाद न दिल्यास मोबाईल क्रमांक खंडित करण्यात येईल, अशी धमकीही दिली जात आहे. काही वेळा, विद्वेषपूर्ण कृती करणारे मालवेअर स्थापित करण्यासाठी किंवा फिशिंग लिंकवर क्लिक करून लोकांना फसवण्याचा प्रयत्न करू शकतात.

संदेश किंवा अधिकृत सूचनांद्वारे मोबाईल क्रमांक खंडित करण्याबाबत ट्राय कधीही संप्रेषण सुरू करत नाही. तसेच अशा हेतूने ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी त्याने कोणत्याही तिसऱ्या एजन्सीला अधिकृत केलेले नाही. म्हणून, कोणत्याही प्रकारचे संप्रेषण (कॉल, संदेश किंवा सूचना) ट्राय कडून असल्याचा दावा करणे आणि मोबाईल सेवा खंडित करण्याची धमकी देणे हा संभाव्य फसवणूकीचा प्रयत्न मानला जावा.

सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीसाठी दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्यासाठी, नागरिकांना दूरसंचार विभागाच्या संचार साथी प्लॅटफॉर्मवर चक्षू सुविधेद्वारे संशयित फसव्या संप्रेषणाची तक्रार करण्यास प्रोत्साहित केले जाते. या प्लॅटफॉर्मवर https://sancharsaathi.gov.in/sfc/ द्वारे प्रवेश करता येईल. सायबर गुन्ह्याची पुष्टी झाली असल्यास पीडितांनी सायबर क्राइम हेल्पलाइन नंबर ‘1930’ वर किंवा https://cybercrime.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर घटनेची तक्रार करावी.

Related posts

शेतमाल आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ यांच्या निर्यातीत ३१ टक्क्यांनी वाढ

चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव, स्व.राज कपूर जीवन गौरव आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारांची घोषणा

300 एकर जमीन क्षारपडमुक्त करण्याचा मानस

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406