July 27, 2024
Isamil Pathan Comment on Shivrayanchi Dharmaneeti
Home » सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेवून स्वराज्याची निर्मिती – डॉ. इस्माईल पठाण
गप्पा-टप्पा

सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेवून स्वराज्याची निर्मिती – डॉ. इस्माईल पठाण

ismail Pathan speech on His book Shivarayachi Dharmaniti

लेखकाच्या मनोगतात डॉ. इस्माईल पठाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वसामान्य अशा सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेवून स्वराज्याची निर्मिती केली. त्यांनी जातीच्या आधारावर नाही तर कर्तबगारीच्या जोरावर अनेक सामान्य लोकांना महत्त्वाची पदे दिली. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची त्यांची भूमिका राहिली.

डॉ. इस्माईल पठाण काय म्हणाले….

  • शिवाजी महाराज हिंदू धर्माकडे पुरोगामी, तर मुस्लिम धर्माकडे मानवावादी दृष्टिकोनातून पाहात होते. ख्रिश्चन, पोर्तुगीजांकडे ते त्रयस्त दृष्टिने पाहात होते. प्रथम ते त्यांच्याकडे मित्र म्हणून पाहात होते. पण बारदेस येथे त्यांचे धर्माच्यानावाने सुरू असलेले अत्याचार थांबविण्यासाठी महाराजांनी थेट तलवारीलाच हात घातला.
  • पराक्रम अन् निष्ठा या दोन तत्त्वांच्या आधारेच शिवाजी महाराज यांनी ७०० मुस्लिम पठाणांना सैन्यामध्ये सामिल करून घेतले.
  • हातात शस्त्र धरायची परवानगी नसणाऱ्या भूमिपूत्रांना शिवाजी महाराज यांनी आपलेसे करून स्वराज्य उभारणीत सामिल करून घेतले. भंडारी, रामोशी, महार, मांग, बेरड अशा समाजातील लोकांचे गुण पारखून त्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन सैन्यात सामिल करून घेतले.

डॉ. इस्माईल पठाण काय म्हणाले….

  • शिवाजी महाराज यांचा मुस्लिमधर्माकडे पाहाण्याचा उद्दात्त दृष्टिकोन.
  • देशमुखापासून महारांपर्यंत सर्वांशी शिवाजी महाराजांनी संवाद साधलेला आहे. स्वराज्याची संकल्पनेचा तो संवाद आहे.
  • ज्ञान आणि भान ठेवूनच लोककल्याणकारी राजवट उभी राहाते.
  • शिवाजी महाराज यांचे वागणे नितीच्या आधारावर होते त्यामुळे त्यांना भ्रष्टाचारी, अत्याचारी, अन्यायी, स्त्रीयांचा अवमान करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध प्रमाणीची घृणा होती.
  • मराठ्यांचे राज्य हे नीतीमत्त्वर आधारित होते.

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

सुप्त गर्भाशयदाहाचा वेळीच करा प्रतिबंध

कवितेच्या जन्मा मागची गोष्ट सांगणारा लेखसंग्रह

कवी असा का वागतो ?

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading